अधिवेशनाचा कालावधी लहान असला तरीही शनिवार व रविवार असे २ दिवस अधिकचे आहेत. सरासरी ५ तास दिवस काम व्हावे अशी अपेक्षा असताना रोज १० तास सभागृहाचे काम चालते.
विरोधी पक्षात एकी दिसलीच नाही. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते. चुकीच्या माहितीच्या आधारावर कामकाज करण्याचा प्रयत्न केला. पायऱ्यांवर आंदोलन केले. मारामारीचा प्रकार अक्षम्य होता.
कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपोषणाला बसले होते. यानंतर १५ दिवसांच्या आत समिती नेमून अहवाल सादर केला जाईल आणि कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन बच्चू कडू…