आटपाडीतील सराफाचे तब्बल अडीच कोटी रुपये किमतीचे 3.985 किलो सोने दागिने तयार करण्यासाठी कलकत्त्यात नेल्यानंतर सहा जण फरार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र विमानप्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "विमानापेक्षा इमान महत्त्वाचं" म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. वाशिममधील सभेत त्यांनी संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधत शिवसैनिकांना गद्दार खासदारांना जाब विचारण्याचे आवाहन केले, तसेच डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही खासदार फुटणार नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित पत्रकार धमकीप्रकरणी उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संपादक पत्रकार संघाने निषेध व्यक्त केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली.
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी RSSचे कौतुक केल्याच्या भाषणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पोलीस अधिकाऱ्याने निष्पक्ष राहणे अपेक्षित असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही थेट सवाल केला.
यवतमाळमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर निशाणा साधत शिवसैनिकांना "गद्दार जिथे सापडतील तिथे जाब विचारा" असा थेट आदेश दिला. यावेळी त्यांनी भाजपवरही फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.
मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी विद्यार्थ्यांना दप्तरे आणि शालेय साहित्य न मिळाल्याने स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.
राम मंदिरातील देणग्यांबाबतच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. संजय राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री नितेश राणेंनी पुराव्याची मागणी केली असून, SIT तपासातही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दोघांनी ११ किलोमीटरची पायपीट करून मध्यरात्री दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून नागपूरला एकाच विमानातून प्रवास केल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
मराठा समाजातील युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सारथी संस्थेच्या कार्याचा गौरव करत विविध योजनांची माहिती दिली.
विलास घुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका आरोपीला अटक न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली.