मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी 58 लाख कुणबी नोंदींबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जरांगे यांच्या आंदोलनानंतर 15 हजार 597 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर संजय राऊत यांनी हा खटला ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. तिरंग्याबाबत आरएसएसची भूमिका, सरकारचे अपयश, SIR आणि राहुल गांधींच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपला लक्ष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भूसंपादन मोबदला, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि कृषी विभागाशी संबंधित निर्णयांचा यात समावेश आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत विधिमंडळातील फूट आणि राजकीय पक्षातील फूट यामध्ये फरक असल्याचा युक्तिवाद केला.
प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यातील कथित सहा तासांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना वेग आला आहे. या चर्चांवर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देत प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय पक्षांतर्गत असल्याचे स्पष्ट केले.
वर्ध्यात आयटक आणि सिटू संलग्न संघटनांच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि योजना कामगारांनी विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन केले. किमान 30 हजार रुपये वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा आणि नियमितीकरणाच्या मागण्या करण्यात आल्या.
बावधन जिल्हा परिषद गटातील शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि शाळांच्या पायाभूत सुविधांवर समितीचा भर राहणार आहे.
सोलापूर दौऱ्यात सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी अंधारेंची टीका राजकीय वैफल्यातून असल्याचा दावा केला.
मुंबईतील संघटना मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नव्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. सचिन आहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना नगरसेवकांची बैठक झाल्याने मुंबईची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आमदार शंकर जगताप यांनी किमान २० गुंठे जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला.
Satara : वाई शहरातील सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात नदीपात्रातील अस्वच्छ पाण्यात भाजी धुतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.