
जालन्यातील महत्त्वाची घटना
२९ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वैजापूर बसस्थानक परिसरात सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी गस्त घालत होते. त्यावेळी बसस्थानकातील बाकावर एक बेवारस बंग त्यांच्या नजरेस पडली, संशयास्पद वस्तू समजून त्यांनी ती बंग तात्काळ उचलून एस.टी. नियंत्रक कार्यालयात जमा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, सुमारे दोन तासांनंतर प्रवासी गणेश देविदास जानराव हे बसस्थानकात आले आणि त्यांनी आपली बेंग हरवल्याचे सांगत चौकशी सुरू केली. त्यावेळी सुरक्षा रक्षक तडवी यांच्या लक्षात आले की, तीच बॅग त्यांनी नियंत्रक कार्यालयात जमा केली होती.
जालन्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली! ‘या’ नेत्यांनी सपकाळांच्या उपस्थितीत केला प्रवेश
सोन्याचे दागिने, महत्वाच्या वस्तू केल्या परत
तत्काळ संबंधित प्रवाशाला एस.टी. नियंत्रकांच्या कार्यालयात नेले, तेथे ओळखा पडताळणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रवासी जानराव यांनी बेंगेचे अचूक वर्णन दिल्याने ती त्यांचीच असल्याचे निश्चित झाले. या प्रामाणिक कृतीबद्दल वैजापूर एस.टी. आगाराचे प्रमुख किरण धनवटे यांनी सुरक्षारक्षक बी. आर. तडवी यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी एस. टी. चे टी. आय. भदाणे, कोकाटे, गरुड, जाधव, गंगवाल, ठाकूर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी तडवी याच्या कामगिरीचे अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या घटनेमुळे एस.टी. विभागातील कर्मचा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडूनही तडवी यांच्या प्रामाणिकतेबद्दल प्रशंसेचा वर्षाव होत आहे. आज ज्या काळात हरवलेली वस्तू मिळण्याची शक्यता कमी असते, त्या काळात बी. आर. तडवी यांनी दाखवलेला प्रामाणिकतेचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी आहे. एसटी आगाराच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बंग उघडण्यात आली असता, त्यात तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि अन्य काही महत्त्वाच्या वस्तू असल्याचे दिसून आले.
Jalna Crime: जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर 10 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; शहरात खळबळ