महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण यांच्या वतीने शुक्रवार (२८), शनिवार (२९) नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील आपेगाव येथे पहिले जिल्हा वारकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.
अंबड नगरपालिका निवडणुकीत जुन्या निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांची नाराजी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
जालन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस. परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. खरीप पिकाचीही वाट लागली आहे. यंदाचा पाऊस बराच लांबला असून शेतकऱ्यांचे जीव मेटाकुटीला आले आहेत
एस टी कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत साडेतील लाखांच्यावर ऐवज मालकाला परत केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एक प्रकारे माणुसकीचा विजय झाला आहे. नक्की काय घडले जाणून घ्या
गोरंट्याल यांच्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे अनेक माजी सदस्यही भाजपमध्ये सामील होतील, ज्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.
Manoj Jarange patil in mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पेटणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
औद्योगिकीकरण झपाट्याने वाढणारे शहर जालना सध्या नावारूपाला येत असून याठिकाणी रोजगार मेळावा झाला आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य, रोजगाराबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सरकारी अनुदानात १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यानंतर भाजप आमदाराने भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.