जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी विजय मिळवला आहे. जालनामधील प्रभाग १३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला आहे.
जालन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस. परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. खरीप पिकाचीही वाट लागली आहे. यंदाचा पाऊस बराच लांबला असून शेतकऱ्यांचे जीव मेटाकुटीला आले आहेत
एस टी कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत साडेतील लाखांच्यावर ऐवज मालकाला परत केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एक प्रकारे माणुसकीचा विजय झाला आहे. नक्की काय घडले जाणून घ्या
गोरंट्याल यांच्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे अनेक माजी सदस्यही भाजपमध्ये सामील होतील, ज्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.
Manoj Jarange patil in mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पेटणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
औद्योगिकीकरण झपाट्याने वाढणारे शहर जालना सध्या नावारूपाला येत असून याठिकाणी रोजगार मेळावा झाला आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य, रोजगाराबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सरकारी अनुदानात १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यानंतर भाजप आमदाराने भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.
जालन्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. शेतीच्या कामासाठी शिवारात गेलेल्या शेतकरी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिवारात विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्यातही पाऊस बरसला आहे. जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले.
मी आता मुंबईत विजयाचा गुलाल घेऊनच जाणार. मी कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. माझ्या विरोधात खोटं नाटक करून बदनामी करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पण गरज पडल्यास जीव गेला तरी चालेल, मी समाजाशी गद्दारी करणार नाही
जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.