Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News : पपई दरांवरून जळगाव शहरात संघर्ष पेटला! लवकरच तोडगा काढण्याची मागणी

परराज्यात पपईला २२ रुपये किलोचा दर असताना शहाद्यात ठरलेल्या कमी दराच्या प्रति आठ ऐवजी १४ रुपये किलोचा दर मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2025 | 06:22 PM
Conflict erupts between farmers and traders over price of papaya crop Jalgaon News

Conflict erupts between farmers and traders over price of papaya crop Jalgaon News

Follow Us
Close
Follow Us:

Jalgaon News: शहादा : पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्या बैठकीत ठरलेल्या आठ रुपये ११ पैसे या दराप्रमाणे केवळ वरचे ११ पैसे अधिकचा भाव व्यापाऱ्यांनी नाकारला आहे. यामुळे शहादा तालुक्यात व्यापारी आणि पपई उत्पादक शेतकरी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. परराज्यात पपईला २२ रुपये किलोचा दर असताना शहाद्यात ठरलेल्या कमी दराच्या प्रति आठ ऐवजी १४ रुपये किलोचा दर मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या संदर्भातला तोडगा काढण्याची सूचना केली असली तरी देखील शहाद्यात शेतकऱ्यांनी पपई तोड बंदीचा निर्णय घोषित केला आहे. यामुळे जळगावमध्ये पपईच्या भावावरुन वाद पेटला आहे. जिल्ह्यातील पपईच्या खरेदीसाठी दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब राज्यातील व्यापारी सध्या दाखल होत आहेत. या व्यापाऱ्यांनी ११ नोव्हेंबर रोजी पपई दर नियंत्रण समितीसोबत घेतलेल्या बैठकीत ८ रुपये ११ पैसे प्रतिकिलो दर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या फेरीतील चर्चेतून दर कमी करण्याची मागणी
केली होती.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पपईच्या दरामधील वरचे ११ पैसे नाकारले तालुक्यात पपई तोड बंद, लवकर तोडगा काढण्याची मागणी पपई दरांवरून शहाद्यात संघर्ष पेटला आहे.  पणनमंत्री रावल यांची भेट घेत शेतकऱ्यांनी समस्या मांडली. पपई दरांचा तिढा सुटावा यासाठी शेतकऱ्यांनी रविवारी (दि.१६ नोव्हेंबर) रोजी पणनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत समस्या मांडली होती. त्यावर मार्ग काढत जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना सोमवारी दुपारी शेतकरी व व्यापारी यांची बैठक घेत दर निश्चिती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे सोमवारी पपईचे दर निश्चित होणार की संघर्ष पुन्हा वाढणार याकडे लक्ष लागून आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

पणनमंत्री रावल यांच्या सूचनेनुसार शेतकरी आणि व्यापारी यांची बैठक नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने भाऊभाई पाटील, डॉ. प्रफुल्ल पाटील, सागर इंदानी, गौतम पाटील, संदीप पाटील, समाधान पाटील आदी पपई दर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले होते. बैठकीत जिल्ह्यातील पपई उत्पादक उपस्थित राहणार असल्याची माहिती पपई दर नियंत्रण समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

चार दिवसातच व्यापारीवर्गाने बदलला निर्णय

भारतात पपईची लागवडीत महाराष्ट्र तिसरा आहे. नंदुरबार जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पपई लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा साडेसहा हजार एकरावर पपईची लागवड करण्यात आली आहे. या पपईचे उत्पादन निघण्यास प्रारंभ झाला असून, दरावरुन शेतकरी आणि व्यापारी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.

Web Title: Conflict erupts between farmers and traders over price of papaya crop jalgaon news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra farmers
  • papaya benefits

संबंधित बातम्या

कोणी डॉक्टर देता का डॉक्टर! धरणगाव ग्रामीण रुग्णालय सलाईनवर; रुग्णांना राहिले नाही कोणी वाली
1

कोणी डॉक्टर देता का डॉक्टर! धरणगाव ग्रामीण रुग्णालय सलाईनवर; रुग्णांना राहिले नाही कोणी वाली

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य
2

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Prison Overcrowded: राज्यभरातील कारागृहे झालीत ओव्हरक्राउड! कारागृहातील सेवांवर येतोय अतिरिक्त ताण
3

Prison Overcrowded: राज्यभरातील कारागृहे झालीत ओव्हरक्राउड! कारागृहातील सेवांवर येतोय अतिरिक्त ताण

महानगरी एक्स्प्रेसची भूसावळला झाडाझडती; जळगाव रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा आहे कडा पहारा
4

महानगरी एक्स्प्रेसची भूसावळला झाडाझडती; जळगाव रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा आहे कडा पहारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.