Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता अन् त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचे टीकास्त्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या सभेमधून महायुतीवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 16, 2024 | 07:27 PM
congress priyanka gandhi sabha in kolhapur vidhan sabha election 2024

congress priyanka gandhi sabha in kolhapur vidhan sabha election 2024

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. प्रियांका गांधी यांची शिर्डी व कोल्हापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्र हा संत महात्म्यांची पवित्र भूमी आहे. ही महापुरूषांची भूमी आहे. या भूमीतून मानवता आणि समतेचा संदेश देण्यात आला. या सर्वाचे स्वातंत्र्याच्या लढाईत मोठे योगदान आहे. या भूमीत आल्यानंतर अभिमानास्पद वाटते. पण महाराष्ट्राच्या भूमीचा अपमान होत आहे, शिवरायांचा सुद्धा अपमान केला आहे. अशा सरकारला पाडून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी यांनी केले .

कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रचारार्थ ऐतिहासिक गांधी मैदानात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच करवीर निवासिनी अंबाबाई ,लोकराजे राजश्री शाहू महाराज यांचा मराठीत उल्लेख करून उपस्थितांचे वाहवा मिळवली. शाहू, फुले ,आंबेडकरांची ही नगरी असून देशाला आजादी मिळवून देण्यासाठी येथील स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान दिली आहे. एकनाथ ,नामदेव, तुकाराम या संतांनी समानता मानवतेचा संदेश दिला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. मोदी व्यासपीठावर येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली.

गद्दारांना पाडा पाडा पाडा…शरद पवारांची वाईच्या सभेत तुफान राजकीय टोलेबाजी

पुढे त्या म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकली की दुःख होतं. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. जे नेते प्रचार करतात त्यांच्याकडून अपेक्षा असते की सकारात्मक बोलतील, चांगले विचार मांडतील, पण असं होताना दिसत नाही. ही खरी शोकांतिका आहे. मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात, पण शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. अन्य एके ठिकाणी काम सुरू होत ते आता बंद झाले आहे. महागाईचा सामना सर्वजण करत आहेत. मोदी व्यासपीठावर येतात आणि लाडकी बहीण बोलतात, निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली.आपलंच पैसे काढून घेतले आणि आता देत आहेत. निवडणुकीत पैशाच्या आधारावर, जाती धर्मावर बोलून निवडणूक जिंकता येते, असा त्यांचा समज झाला आहे त्यामुळे ते काम करत नाहीत. ज्या मुद्दयावर काम केलं पाहिजे ज्या मुद्दयावर चर्चा केली पाहिजे त्यावर बोललं जात नाही,” असं मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले.

प्रियांका गांधींनी स्वीकारले नरेंद्र मोदींचे आव्हान; भरसभेत बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत…

पुढे प्रियांका गांधी म्हणाल्या की, “गेल्या दहा वर्षात या सरकारने काय काम केले ते आधी सांगावं आणि मगच निवडणुकीला सामोरे जावं.  या देशात, राज्यात आता नवीन परंपरा सुरू झाली आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात असा त्यांचा समज झाला आहे. राज्यातील सहा हजार उद्योग बंद पडले आहेत. आठ लाख तरुण बेरोजगार झाले आहेत. जीएसटी कराच्या बोजाणे छोटे उद्योग, मोठे उद्योग बंद झाले आहेत. सत्तेवर बसून हे खरेदी करणारे सरकार असून सरकार जनतेने निवडले असले तरी आपली शक्ती ,आपली ताकद हे त्यांचे पाठबळ आहे हे ते विसरून गेले आहेत. भविष्यात आपल्या मुलांचे भवितव्य निभावयाच असेल तर निवडणुकीची ही लढाई आपण जिंकावी,” असे प्रियांका गांधी यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

Web Title: Congress priyanka gandhi sabha in kolhapur maharashtra vidhan sabha election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 07:26 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.