Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटकांची पावले कोकणाकडे वळु लागल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी

निळ्या शांत दुरवर पसरलेल्या समुद्र किनाऱ्यांबरोबरच ॲग्रो टुरीझम व कातळशिल्प पर्यटकांचे खास आकर्षण

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 25, 2024 | 11:10 AM
पर्यटकांची पावले कोकणाकडे वळु लागल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी
Follow Us
Close
Follow Us:

राजापूर : बायकॉट मालदीवचा नारा सोशल मिडियावर घुमू लागल्यानंतर या हंगामात पर्यटकांची पावले कोकण भुमीत पडु लागली आहेत. कोकणातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण ठरले असुन दापोली तालुक्यापासुन अगदी राजापूर तालुक्यातील अनेक समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. राजापूर तालुक्यातील कशेळी बीच पॉइंट पर्यटकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असुन या ठिकाणी पर्यटक हजेरी लावत आहेत. तर पाचल तळवडे येथील पितांबरी कृषी पर्यटन केंद्राने पर्यटकाना भुरळ घातली आहे.

कोकण म्हटले की देवभुमी, अपरांत भुमी आणि या कोकणची ओढ कायम अनेकांना लागुन राहीली आहे. गेल्या काही वर्षात कोकणात पर्यटकांची पावले वळु लागली आहेत. प्रारंभी कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर रेंगाळत एक दिवसाचे पर्यटन करणारा पर्यटक आता कोकणात थांबु लागला आहे. त्यातुन कृषी पर्यटन केंद्राना इथे येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे.

सध्या गणपतीपुळे रत्नागिरी पावस असा प्रवास केल्यानंतर पर्यटक आडिवरे येथील तावडे भवनला थांबून दुसऱ्या दिवशी आडिवरे महाकाली वेत्ये बीच कशेळी बीच पॉइंट या भागांना सर्वाधिक पसंती देताना दिसत आहेत. कशेळी बीच पॉइंटवर सातत्याने असणारी पर्यटकांची रीघ स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारी ठरली आहे.

कातळशिल्प पर्यटकांचे आकर्षण –
कोकणात जाभ्या दगडाच्या कातळावर असणारी मध्ययुगीन कातळ शिल्पही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. राजापूर शहरापासुन जवळच असलेल्या बारसु येथील कातळशिल्प पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरले आहे. या कातळशिल्पाला युनेस्कोच्या यादीत स्थान (जागतिक वारसा हक्का) मिळण्याची शक्यता आहे. तर हे कातळशिल्प मानवी इतिहासाच्या पाउलखुणा असल्याचे मानले जात आहे. या ठिकाणी असणारे दोन वाघांच्या मानेला धरुन उभा असणाऱ्या मानसाचे चित्र जगातील चार पुरातन संस्कृतींशी साधर्म्य सांगणारे आहे. त्यामुळे पर्यटक या कातळशिल्पाला मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.

कृषी पर्यटन –
कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन केंद्रांची उभारणी होत असुन स्थानिक पर्यटकांसह देश विदेशातील पर्यटक या कृषी पर्यटन केंद्राना पसंती देत आहेत. राजापूर तालुक्यातील गणेश ॲग्रो फार्म व आता पितांबरी कृषी पर्यटन केंद्र सर्वच प्रकारच्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

जुवे बेट –
जैतापूरपासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मात्र चारही बाजुने पाण्याने वेढलेल्या जुवे बेटावर पर्यटक चांगलेच रमू लागले आहेत. ऐतिहासिक पार्श्वभुमी असणारे जुवे बेट पर्यटकांना गजबजाटापासुन दुर नेत शांतीचा अनुभव देणारे ठरत असल्याने अनेक पर्यटक या जुवे जैतापूर बेटाला भेट देताना दिसुन येत आहेत.

उन्हाळे – राजापूरची गंगा – धोपेश्वर – याच पर्यटनाच्या हंगामात राजापूरची प्रसिध्द गंगा अवतरल्याने पर्यटकांची पावले गंगास्नानासाठी वळु लागली आहेत. राजापूर शहरापासुन दोन किलोमिटच्या अंतरावर असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडावर स्नान करुन अनेक पर्यटक गंगास्नानाची पर्वणी साधत आहेत व गंगा स्नान झाल्यानंतर कोकणची दक्षिण काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुरातन श्री देव धुतपापेश्वर मंदिराला भेट देताना दिसुन येत आहेत .

पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे घाट पर्यटकांना खुणावु लागले –
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करुळ घाट बंद असल्याने पश्चिम महाराष्ट्राकडे प्रवास करणारा पर्यटक राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाला पसंती देत आहे. मुंबइ, पुणे कोल्हापूर सांगली सातारा या भागाकडे जाणारा पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणात अणुस्कुरा घाटाचा वापर करताना दिसुन येत आहे . या अणुस्कुरा घाटातील निसर्ग सौंदर्य पर्यटकाना भुरळ घालत असुन अनेक पर्यटक व प्रवासी या घाटात घुटमळताना दिसुन येतात . इथे सातत्याने पर्यटक थांबत असल्याने स्थानिकाना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत .

कोकणी खाद्याला सर्वाधिक पसंती –
कोकणात येणारा पर्यटक सध्या मोठ्या हॉटेल पेक्षा खास कोकणी पध्दतीच्या जेवणाला सर्वाधिक पसंती देत असुन स्थानिक खाद्याला सर्वाधिक मागणी आहे . चुलीवरची भाकरी, गावठी कोंबडी वडे, घावणे, आंबोळी, आंब्याचे रायते, फणसाची भाजी व हाफुसची चव पर्यटकांच्या जीभेवर चांगलीच रुळली आहे.

कोकणात पर्यटक – पण शासन उदासिन –
गेल्या काही वर्षात कोकणात मोठ्याप्रमाणात पर्यटक येवु लागला असला तरी शासन स्तरावरुन अद्यापही म्हणावा तसा या पर्यटन स्थळांचा विकास झालेला नाही . रस्ते व अन्य सोयीसुविधांच्या बाबतीत अद्यापही अनेक पर्यटन स्थळे अविकसित आहेत . मध्यंतरी बायकॉट मालदीव चा नारा देत .. चला कोकण बघुया अशी हाक भाजपाने दिली होती . त्याला पर्यटकानी चांगलाच प्रतिसाद दिला असला तरी इथली असुविधांचे आगर असलेली ही पर्यटन स्थळे जर या पर्यटकाला पुन्हा कोकणाकडे वळवणारी ठरण्यासाठी आता शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे . पर्यटकांसाठी पायाभुत सोयी सुविधा निर्माण केल्यास कोकण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अजुन झळकेल यात तिळमात्र शंका नाही . त्यामुळे कोकणी माणसाच्या शासनाच्या भुमिकेकडे नजरा लागुन राहिल्या आहेत.

Web Title: Employment opportunities for the locals as tourists flock to konkan rajapur ratnagiri maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Rajapur News Update
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!
1

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”;  राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
3

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना
4

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.