Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खामगाव तालुक्यात बोगस बियाण्यांचा फटका! सोयाबीन उगवलेच नाही; दुबार पेरणीने शेतकरी आर्थिक संकटात

खामगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीनची उगवणच झाली नाही. अनेक शेतांमध्ये ८० ते १०० टक्के उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 12, 2026 | 03:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

यंदाच्या खरीप हंगामात खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून सोयाबीनची पेरणी केल्यानंतरही अनेक शेतांमध्ये उगवण झाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी ८० ते १०० टक्के उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून प्रमाणित असल्याचे सांगून विक्री करण्यात आलेले बियाणे खरेदी केले होते. पावसाची परिस्थिती अनुकूल असतानाही पीक उगवले नसल्याने मेहनत आणि मोठा आर्थिक खर्च वाया गेला. त्यामुळे कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा पेरणीसाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

या प्रकारानंतर बाधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून, संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई, मोफत बियाणे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी ज्या शेतांमध्ये उगवण झाली नाही, त्या शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून पंचनामे सुरू करण्यात आले असून, बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तपासणीत दोषी आढळणाऱ्या कंपनी किंवा विक्रेत्यांवर बियाणे अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Web Title: Farmers in khamgaon taluka hit by bogus seeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Washim

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.