राज्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेमुळे शिक्षक आणि प्रगणकांवर मोठा कामाचा ताण निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात त्यांची मोठी फरफट होत असल्याचं चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हा कार्यालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात द्वितीय तर विदर्भात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उभारण्यात आलेल्या १५ ते २० उद्यानांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. या उद्यानांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून सामाजिक संवादालाही चालना मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ५ हजार १६२ हेक्टरने वाढले आहे.
पहिल्या दिवशी Vijay Maharaj Khawale यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली, तर Sanjay Maharaj Pachpore यांनी रामकथा सादर केली. संपूर्ण आठवडाभर विविध नामवंत कीर्तनकार दररोज रात्री ८ वाजता सेवा देणार आहेत.
“महापुरुषांचा अपमान आता सहन केला जाणार नाही,” असा इशारा माजी राज्यमंत्री Gulabrao Gavande यांनी दिला. महापुरुषांबाबत वारंवार आक्षेपार्ह वक्तव्ये होत असून त्यावर कारवाई होत नसल्याने समाजात संताप वाढत असल्याचे म्
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन डंपर जप्त केले. नांदुरा–मोताळा मार्गावरील वॉटर सप्लाय परिसरात मध्यरात्री गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
Washim : खरीप हंगामाच्या तोंडावर ‘डीएपी’ खताच्या विक्रीत मोठा घोळ उघड झाला असून ई-पॉस प्रणालीला बगल देत २४० बॅगची बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचे समोर आले.
अकोला येथील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळेत ‘गोमाता सन्मान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने झाली.
देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी वाडी येथील सिंचन समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री Prataprao Jadhav यांच्या पुढाकारामुळे पाट प्रकल्पाला मंजुरी मिळाली.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज येथे मिरवणुकीदरम्यान डीजेवरून दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले असून १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही रेकॉर्डिंग अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक पेपरपूर्वी ३० मिनिटे आणि परीक्षा संपल्यानंतरही रेकॉर्डिंग सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्रशासन विशेष उपक्रम राबवत आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारी जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण गुरुवारी होणार आहे.
वाशिम येथे आयोजित ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनीला तब्बल ४० हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.