Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत

प्रादेशिक हवामान विभागाने गेल्या 24 तासांपासून हिंगोलीसह परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला असून, जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले ओढ्यांना पूर आला असून, शेतकरी, नागरिकांनी पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2024 | 07:25 AM
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी

Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता काही जिल्ह्यात मुसळधार होताना दिसत आहे. त्यातच हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये पावसाने जोर धरला असून, त्या भागांत अद्यापही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे हिंगोली शहरातील सखल भागात पाणी साचले. जिल्हा प्रशासनातर्फे सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरु आहे.

हेदेखील वाचा : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

प्रादेशिक हवामान विभागाने गेल्या 24 तासांपासून हिंगोलीसह परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला असून, जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले ओढ्यांना पूर आला असून, शेतकरी, नागरिकांनी पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नदीकाठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मोठ्या धरणात पाण्याचा येवा असाच राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.

शहरातील अनेक भागांत नागरिकांसाठी मदतकार्य

शहरातील सिद्धार्थनगर, इंदिरा नगर आणि कुशल नगरातील नागरिकांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकिय सेवा, रुग्णवाहिका, डॉक्टरांच्या चमूसह तैनात ठेवण्यात आल्या आहेत. स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयात नागरिकांच्या सेवेत डॉक्टरांसह वैद्यकीय पथक, मुबलक औषधीसाठा, किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले आहे.

रस्त्यावरच पुराचे पाणी; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

शहरातील जीनमाता नगर, बांगर नगर, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा, डिग्रस, कोंढूर येथेही पाऊस खानापूर ते ईसापूर अंधेरी रोडवर पुराचे पाणी आले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. सावरखेडा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 8 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.

हेदेखील वाचा : गुजरातमध्ये पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू तर 17,800 जणांना सुरक्षितस्थळी हलवले

Web Title: Heavy rain in hingoli district water on the roads nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 07:12 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.