Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळमधील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; नद्या, नाले ‘ओव्हर फ्लो’, वाहतुकीवर परिणाम

संततधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा व खुनीनदी या मागील काही दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 14, 2025 | 03:08 PM
पाटणबोरी परिसरात मुसळधार पाऊस

पाटणबोरी परिसरात मुसळधार पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाले आहे. यासह बाजारपेठेवर परिणाम झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

संततधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा व खुनीनदी या मागील काही दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहे. थोड्या पावसाने सुद्धा बोरी मांडवी-वाऱ्हा कवठा हे मार्ग बंद होत आहे. त्याचा परिणाम अनेक गावातील सर्वच लोकांना व्यथा भोगाच्या लागत आहे. शेतकरी भाजी विक्रेता-विद्यार्थी, व्यापारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी बाजारपेठ दिवसेंदिवस ठप्प होत आहे.

दरम्यान, शेतातील पिके पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यासमोर पुढच्या भवितव्याचा प्रश्न पडला आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस राहिल्यास शेतकऱ्यांच्या खरीप पिकावर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसाचा जनावरांना सुद्धा फटका बसत आहे.

पावसामुळे सर्वत्र चिखलांचे साम्राज्य

पावसामुळे सर्वत्र चिखलांचे साम्राज्य पसरले असून, चराई सुद्धा होऊ शकत नसल्याने त्याचा परिणाम दुधावर होत आहे. शेतातील अनेक कामे पूर्णतः थांबलेली दिसत असून, परिणामी पिकातील तण मात्र वाढत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतातील कामे थांबल्याने विशेषतः महिला मजूर सुद्धा चिंतातूर झालेली आहे. शेतीच्या मजुरीवरच बचत गटाचे हप्ते भरल्या जात असल्याने महिलांना बचतगटाचे हप्ते कसे भरावे या चिंतेत महिला मजूर सापडल्या आहेत

निसर्गाच्या आपत्तीत अधिकारी कुठे?

या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी व कर्मचारी मात्र पावसाच्या संकटापासून कुठे दडून बसले आहेत, हे जनतेला समजण्यास मार्ग नाही. निसर्गाची ही आपत्ती अजून किती दिवस सुरू राहील, याबाबतही प्रशासन अद्याप जनतेला स्पष्ट माहिती देऊ शकलेले नाही.

Web Title: Heavy rains disrupt normal life in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Climate Change
  • heavy rains
  • Weather Update

संबंधित बातम्या

नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…
1

नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.