Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

कोयनानगर येथील नेहरू गार्डनजवळील शिवाजीसागर जलाशयात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा कोयना धरणग्रस्त, अभयारणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चैतन्य दळवी यांनी धरणग्रस्तांच्या बैठकीत बोलताना दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2025 | 01:13 PM
'पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार'; धरणग्रस्तांच्या बैठकीत चैतन्य दळवी यांचा इशारा

'पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार'; धरणग्रस्तांच्या बैठकीत चैतन्य दळवी यांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

पाटण : कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ६५ वर्षांनंतर आजही ‘जैसे थे’च आहे. धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने, उपोषणे केली. त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून गुरुवारी (दि. २) गांधी जयंतीदिनी सकाळी दहा वाजता कोयनानगर येथील नेहरू गार्डनजवळील शिवाजीसागर जलाशयात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा कोयना धरणग्रस्त, अभयारणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चैतन्य दळवी यांनी धरणग्रस्तांच्या बैठकीत बोलताना दिला.

कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये किती क्षेत्र घ्यायचे आहे, हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे अनेक विकासकामांवर बंधने येत आहेत. बफर झोनमधील पर्यावरण विकास समिती संबंधित गावातील जनतेच्या निर्णयाचे व त्यांनी कायद्याच्या कक्षेत तयार केलेल्या आराखड्यानुसार चालल्या पाहिजेत. मात्र तसे न होता संबंधित निधी पडून रहात आहे, असे दळवी यांनी सांगितले.

अधिकारी नेत्यांना देतात खोटी माहिती

अनेक वेळा अधिकारी धरणग्रस्तांबाबत नेतेमंडळींना खोटी माहिती देतात. या अधिकाऱ्यांना धरणग्रस्तांचे काही देणेघेणे नाही. त्यामुळे या विरोधात धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा दळवी यांनी दिला आहे.

जिल्ह्याच्या पुत्राकडे पुनर्वसन खाते

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व मदत खाते हे जिल्ह्याचे पुत्र मकरंद पाटील यांच्याकडे असतानाही कोयना धरणग्रस्तांना आंदोलन करावे लागते, ही खेदाची बाब आहे. त्यांच्या मतदारसंघातही कोयना धरणग्रस्त आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा कोयना धरणग्रस्तांमधून व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा : ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी

Web Title: If rehabilitation is not done we will commit water burial chaitanya dalvi warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
1

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

Marathi Sahitya Sammelan : “तुमच्या समोर असणारा पाटील हा…”; काय म्हणाले Akhil Bhartiya Sahitya संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?
2

Marathi Sahitya Sammelan : “तुमच्या समोर असणारा पाटील हा…”; काय म्हणाले Akhil Bhartiya Sahitya संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
3

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

कोयना धरणात 91.42 टीएमसी पाणीसाठा शिल्लक; वीजनिर्मितीसाठी ठरेल फायद्याचा
4

कोयना धरणात 91.42 टीएमसी पाणीसाठा शिल्लक; वीजनिर्मितीसाठी ठरेल फायद्याचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.