Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश

मुसळधार पावसामुळे मराठवाडा विदर्भ राज्यातील विविध कानाकोपऱ्यातील शेतकरी हवालदीन झाला आहे. याला अपवाद कर्जतमधील शेतकरी देखील राहिले नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 30, 2025 | 03:12 PM
Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/संतोष पेरणे : हाताोंडाशी आलेला घास पावसानं हिसकावला, आता न्याय मागायचा तरी कुणाकडं? असा प्रश्न सध्या बळीराजाला भेडसावत आहे. राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतीचं अतोनात नुकसान झालं. मराठवाडा विदर्भ राज्यातील विविध कानाकोपऱ्यातील शेतकरी हवालदीन झाला आहे. याला अपवाद कर्जतमधील शेतकरी देखील राहिले नाही.

कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यामधील 9 0 टक्के  शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली असून पूर्ण संपूर्ण कापणीसाठी आलेले भात जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. वर्षातून एकदाच भारताचे पीक घेतले जाते त्यातच संपूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत ही अशी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच सतत होणाऱ्या नुकसानी मुले शेतीतकरी शेती व्यवसायापासून दूर जायला लागला आहे.

तालुक्यातील 6 मे पासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं नाही. परंतु ज्यांनी बियाणं पेरलं आहे त्यांचे मात्र शंभर टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान कर्जत तहसीलदार यांच्याकडून महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेऊन उद्यापासून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

कर्जत तालुक्यात दोन दिवस वादळी वारे आणि सोबत आलेला पाऊस यामुळे भाताच्या शेतीमध्ये उभे असलेले पीक संकटात आले आहे.भाताचे पीक शेतामध्ये कोसळले असल्याने भाताची शेती करणाऱ्या बळीराजा संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत अशी मागणी कर्जत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी केला आहे.

कर्जत तहसीलदार यांच्याकडून भाताच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. त्यासाठी आज कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातील कृषी विभाग,महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेतली. त्या बैठकीत भात ओईकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी गावपातळीवर टीम तयार करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार यांच्याकडून देण्यात आली. गाव पातळीवर तलाठी,ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहायक या तिघांची टीम पंचनामे शेतात जाऊन करणार आहेत.

अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे सरकारने याकडे लक्ष देऊन सरसकट पंचनामे करावे सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करावी ही आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे, असं पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं आहे.

दरवर्षी आमच्या शेतीचे असे नुकसान होत असतात सरकार कर्जत तालुक्यामधील शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठली भरपाई मिळाली नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यावर्षी सरकारला विनंती तात्काळ शेतकऱ्याला भरपाई द्यावी तहसीलदारांनी महसूल खात्याला आदेश देऊन पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे, असं मोरेश्वर जाधव या शेतकऱ्याने सांगितलं आहे.

 

Web Title: Karjat news heavy rains cause huge losses to farmers government orders immediate panchnama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • karjat news
  • maharashtra rain news

संबंधित बातम्या

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
1

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
2

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी
3

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी

MPSC News: कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 827 उमेदवार मुलाखातीस पात्र, तर…
4

MPSC News: कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 827 उमेदवार मुलाखातीस पात्र, तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.