Karjat News : तालुक्यातील कशेळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला तब्बल तीन तासांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. विषबाधा झालेल्या रुग्णाला रुग्ण वाहिकेसाठी ताटकळत रहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील पाली परिसरात टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पावरून वाद निर्माण झाला आहे. प्रकल्पासाठी वन विभागाची 640 एकर जमीन देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
कर्जतमध्ये येऊ घातलेले टोरंट जलविद्युत,पोशीर आणि शिलार या धरणांच्या विरोधात येथील पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर रस्त्यावर उतरले होते.या एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी कर्जत तालुका रस्त्यावर उतरलेला दिसून आला,किमान 2000 कर्जतकर यांनी सह्या…
Matheran News : अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला वन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर झाली आहे.वन जमीन मधून रस्ता तयार करण्यास परवानगी मिळत नसल्याने राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणेला रस्त्याचे काम करता…
तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत टाटा कंपनी कडून धरण बांधले जात आहे.या धरणाचे कामासाठी गेली वर्षभर दररोज सुरुंग स्फोट केले जात असून त्या स्फोटामुळे येथील आदिवासी लोकांच्या घरांना तडे गेले आहेत.
कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाडी परिसरात माती उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर मातीचे ढिगारे साचले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ पाहता अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. हीच समस्या लक्षात घेत आता यावर उपाययोजना राबवण्यात आलेली आहे.
तालुक्यातील पळसदरी रोड परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी तापासात शॉर्टसर्किट म्हणण्यात आलेलं आहे.
तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे.जलजीवन योजनेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नळपाणी योजना यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची टंचाई वाढली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील चार दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोखे आंदोलन केले.
टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाविरोधात 5 जून रोजी मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जनजागृती म्हणून 20 मे पासून दरम्यान कर्जत तालुक्यात धरणे आंदोलन…
टोरंटो कंपनीने राजनाला कालव्यातून बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा केल्याचा प्रकार समोर आला आहे. बंधाऱ्यावर मोटार लावून पाणी वळवण्यात आल्याने स्थानिक पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रायगडच्या कर्जत तालुक्यात भिवपुरी रोड कर्जत दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कारशेडसाठी टाकण्यात येणाऱ्या मातीच्या भरावामुळे पुराचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणी टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. यातील 3000 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असून तेथील ग्रामपंचायत कडून प्रकल्प रद्द करावा अशी भूमिका…
तालुक्यात पाली खालाटी मध्ये होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.त्या ठिकाणच्या आदिवासी लोकांना त्रास आणि त्यांच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश रोखला जावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे.
तालुक्यात संपलेला पक्ष म्हणून बोलणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जोरावर जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि कर्जत नगरपरिषदमध्ये आपला पक्ष सत्तेवर आहे, असा दावा करण्यात आला आहे,
तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांची मानकीवली या गावी स्वतःची अशी जमीन आहे.आता त्यांच्या सुपुत्राच्या नावावर देखील मोठी जमीन पोशिर गावी आढळून आली असून या मंत्री पुत्राने येथे चांगलेच पराक्रम गाजवले…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कर्जत येथील रायगड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.