Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ला पहिल्याच दिवशी लागणार ‘ब्रेक’; सांगलीत थांबा न दिल्याने ‘रेल रोको’चा इशारा

कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (सेमी बुलेट ट्रेन) अखेर सुरु होणार आहे. मात्र, सुरू होण्याआधीच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सांगलीसारख्या महत्वाच्या शहरात थांबा न दिल्याने नागरिकांमधून प्रचंड नाराजी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 13, 2023 | 02:56 PM
कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ला पहिल्याच दिवशी लागणार ‘ब्रेक’; सांगलीत थांबा न दिल्याने ‘रेल रोको’चा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (सेमी बुलेट ट्रेन) अखेर सुरु होणार आहे. मात्र, सुरू होण्याआधीच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सांगलीसारख्या महत्वाच्या शहरात थांबा न दिल्याने नागरिकांमधून प्रचंड नाराजी असून, सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पहिल्याच दिवशी ‘वंदे भारत’चा (Vande Bharat) रेल रोको करण्याचा इशारा दिल्याने वंदे भारतला ब्रेक घ्यावा लागणार आहे.

या रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगली रेल्वे स्थानकावरच वंदे भारत गाडीला थांबा दिला नाही, सांगलीत थांबा न दिल्याने गाडी 50 टक्के मोकळी धावेल व मोठा तोटा होईल. पुणे-सांगली-बेंगलोर रेल्वे दुपदरीकरण 5000 कोटींच्या प्रकल्पामुळे मुंबई, पुणे ते सांगली प्रवास जलद होईल हे स्वप्न अपूर्ण राहील.

महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी बुलेट ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोल्हापुर दरम्यान सुरू होत आहे. वंदे भारत एक्सप्रेसला पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे दुसरे मोठे शहर सांगली रेल्वे स्टेशनवर थांबाच दिला नाही. सांगली ही जागतिक हळदी नगरी, देशातील प्रमुख साखर उत्पादन क्षेत्र, बेदाणा, गुळाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मुंबई, पुणे नंतर सांगली शहरात मोठमोठे मल्टिस्पशालिटी हॉस्पिटल व उच्च तांत्रिक वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.

मुंबई-कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेस गाडीत रोज चढणारे व उतरणारे मिळून एकूण 350 प्रवासी सांगली रेल्वे स्टेशनवरुन प्रवास करतात. या गाडीची सर्वाधिक 50 टक्के तिकिटे विक्री व उत्पन्न सांगली रेल्वे स्टेशनवरून बुक होतात. वंदे भारत एक्सप्रेसला सांगलीत थांबा न देणे हे आत्मघातकी ठरेल कारण ही गाडी अर्धी मोकळी धावेल व गाडी तोट्यात जाईल. मध्य रेल्वेच्या ज्या अधिकाऱ्यानी वंदे भारत एक्सप्रेसला सांगलीत थांबा दिला नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Kolhapur mumbai vande bharat train may face difficulties warning of rail roko nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2023 | 02:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • vande bharat
  • Vande Bharat Train News

संबंधित बातम्या

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
1

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
2

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
3

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Pratap Sarnaik : आता अवैध प्रवासी वाहतुकीची खैर नाही…! परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
4

Pratap Sarnaik : आता अवैध प्रवासी वाहतुकीची खैर नाही…! परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.