Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2025 | 10:53 AM
स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी

स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या अस्थिरतेमुळे त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे. नेपाळमध्ये अनेक भारतीय पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना आता त्यांना परत आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून पर्यटकांना आवश्यक मदत पुरवली जात आहे. राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. याशिवाय, बीड जिल्ह्यातील काही पर्यटक खाजगी वाहनाने रस्तेमार्गे परत येत असून ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले आहेत.

सध्या नेपाळमध्ये आहेत त्या लोकांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. अनावश्यक बाहेर पडू नये व स्थानिक प्रशासनाच्या व भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही मदतीसाठी दूतावासाचे हेल्पलाईन क्रमांक +९७७-९८० ८६० २८८१ (व्हॉट्सअॅप कॉल) +९७७-९८१ ०३२६१३४ (व्हॉट्सअॅप कॉल) यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळच्या काठमांडूत परिस्थिती बिघडली

नेपाळच्या काठमांडूमधील परिस्थिती बिघडताना दिसत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. मंगळवारी सकाळपासून नेपाळच्या संसद भवनाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले. नेपाळमध्ये पसरलेल्या हिंसाचाराचा सामना एका भारतीय पर्यटकालाही करावा लागला आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा

काठमांडूमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. मंगळवारी सकाळपासून संसद भवनाबाहेर मोठ्या संख्येने निदर्शक पंतप्रधानांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आहेत. वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला आहे.

Web Title: Maharashtra tourists stranded in nepal will be brought back safely says dcm ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • Maharashtra Government
  • Nepal Protest

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना
1

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना

Jobs In Maharashtra: मोठी बातमी! सहकारी बँकांमध्ये स्थानिकांना ७०% नोकऱ्या देणार; राज्य सरकारची मोठी घोषणा
2

Jobs In Maharashtra: मोठी बातमी! सहकारी बँकांमध्ये स्थानिकांना ७०% नोकऱ्या देणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं
3

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं

Devendra Fadnavis: “जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
4

Devendra Fadnavis: “जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.