
'अजित पवारांच्या अपघातावर त्यांचे नेते संशय घेतायत तर मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ होण्याची काय गरज?'; संजय राऊतांचा सवाल
मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून हा घातपात असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी विधान केले. रोहित पवार हे आमदार आहेत. अजित पवार यांचा अपघात किंवा विलीनीकरण हे ते बोलू शकतात आणि ते बोलतील, असे राऊत म्हणाले
तसेच मला शंका येत आहे राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी किंवा भुजबळ यांनी ही संशव्य व्यक्त केले आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकांना सांगतात की याद राखा, तुम्ही धमकी कशाला देत आहात? तुम्हाला वेदना का होत आहे? लोकांना दुःख आहे त्यांना विश्वास बसत नाही आहे. आणि शंका येणार कोणीही राजकारण करत नाही. मोदी संसदेत येत नाही आणि काहीतरी होईल म्हणून संशय व्यक्त करतात…काय झालं का? तुम्ही अस्वस्थ का होत आहे. बाकी लोकांना संशय आला आहे तर मग काय झालं?
हे देखील वाचा : तत्परतेने टोल वसुली, सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय; राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीवरुन जोरदार झापलं
दरम्यान, मोदींबाबत संशय येतो ना…मग लोकांना संशय आला आहे तर मग राजकारण कुठे झालं आहे. सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं नाही मिळालं त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे…जेव्हा वारंवार कोणीही बोलतो तेव्हा संशय येतो तेव्हा हे गप्पा बसतात. रोहित पवार काय बोलतील याकडे माझं लक्ष आहे. आणि ते जबाबदारीने बोलतील, असेही ते म्हणाले.
चौकशीबाबत मी बोलणार नाही
चौकशी काय सुरू आहे त्याबाबत मी बोलणार नाही. आता ठाकरे कुटुंब एकत्र आले ना…राजकारण मतभेदापलिककडे कुटुंब असतं. पवार आणि ठाकरे हे दोघे की महाराष्ट्राला मार्ग दाखवलं आहे. शरद पवार हे भीष्मपिता आहेत आणि ते आता एकत्र परिवारात चर्चा करत असतील ते कर्तव्य करत आहेत.
आपण कशाला त्यात मध्ये पडायचं?
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय त्यांच्यावर सोडा ना. आपण कशाला त्यात मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? हा त्यांचा विषय असेल तर त्यांनी त्यातून मार्ग काढावा किंवा निर्णय घ्यावा. प्रत्येकवेळी तुम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना विचारणार, असे मत खासदार राऊत यांनी यापूर्वीच व्यक्त केले.