Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगे पाटील यांचा नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात दौरा; राजकोट किल्ल्याची केली पाहणी

राज्यामध्ये सध्या वातावरण तापले आहे. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून जोडे मारो आंदोलन छेडले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील राजकोट किल्ल्याला भेट दिली आहे. यावरुन राजकारण चालू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 01, 2024 | 01:59 PM
manoj jarange patil in rajkot fort

manoj jarange patil in rajkot fort

Follow Us
Close
Follow Us:

मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेला हा पुतळा कोसळल्यामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली. हा पुतळा नौदलाकडून बसवण्यात आला होता आणि याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीकेची झोड उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मालवणचा दौरा केला आहे. राजकोट किल्ल्यावर जरांगे पाटील यांनी पाहणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी थेट खासदार नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये दौरा करत आहेत.

राजकोट किल्ल्याची पाहणी

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरसभेमध्ये माफी देखील मागितली. मात्र ही राजकीय माफी असल्याचे म्हणत महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन काढले आहे. मुंबईमध्ये त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तर या राजकोट किल्ल्याच्या घटनास्थळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत. त्यांनी राजकोट किल्ल्याची आणि पुतळ्याची पाहणी केली. तसेच कार्यकर्ते व समर्थक यांच्यासोबत संवाद देखील साधला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव किल्ल्यावर दाखल झाले होते.

काय म्हणाले जरांगे पाटील?

यावेळी राजकोट किल्ल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पाहणी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरुन आणि पुतळा कोसळल्यामुळे राजकारण सुरु असल्याची खंत जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. या लोकांना जनताच धडा शिकवेल. थोडे दिवस थांबा. राज्यातील सर्व जनता यांच्या विरोधात जाणार आहे, तसेच या घटनेवरुन आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या, असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसेच राजकोट घटनेतील आरोपी पळून कसा काय जाऊ शकतो? त्याला धरुन आणा. यामध्ये हा पुतळा तातडीने उभारण्यामागे कोणाकोणाचा हात आहे, याचा शोध लागला पाहिजे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Manoj jarange patil visit to rajkot fort chhatrapati shivaji maharaj statue collapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 01:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.