Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोट्यावधी रुपयांच्या पाझर तलावात गाळाचे साम्राज्य, ना शेतीसाठी पाणी ना पिण्यासाठी!

कोकणात शेतीला प्रोत्साहन मिळावे व कोकणातील शेतकऱ्यांनी बारमाही शेतीकडे वळावे यासाठी शासनाने गावोगावी पाझर तलावांचे जाळे विनले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 24, 2024 | 04:05 PM
कोट्यावधी रुपयांच्या पाझर तलावात गाळाचे साम्राज्य, ना शेतीसाठी पाणी ना पिण्यासाठी!
Follow Us
Close
Follow Us:

सुमारे नव्वदच्या दशकात कोकणात वाहुन जाणारे पाणी बारमाही उपयोगात यावे म्हणुन राज्य शासनाने खोडोपाडी बांधलेले पाझर तलाव आजच्या घडीला गाळाने पुर्णत: भरल्याने पाणी साठवण क्षमताच संपुष्टात आली आहे. परिणामी धरण आहे उशासी पण कोरड मात्र घशाशी अशी अवस्था निर्माण झाली आहे. या पाझर तलावामध्ये आता पाणीसाठाच होत नसल्याने ना शेतीला पाणी ना पिण्यासाठी पाणी अशी स्थिती कोकणवासियांवर ओढवली आहे.

कोकणात शेतीला प्रोत्साहन मिळावे व कोकणातील शेतकऱ्यांनी बारमाही शेतीकडे वळावे यासाठी शासनाने गावोगावी पाझर तलावांचे जाळे विनले. छोट्या छोट्या ओढ्यांवर हे पाझर तलाव उभारले गेले. त्यातुन कोकणातील भुजल पातळीही कमालीची वाढली होती. मात्र या पाझर तलावातील गाळ गेल्या तीस चाळीस वर्षात कधीही उपसला गेला नसल्याने आज हे पाझर तलाव पुर्णत: गाळाने भरले गेले आहे.

राजापूर तालुक्यातील सौंदळ बारेवाडी येथे शासनाने ९० च्या दशकात निर्माण केलेल्या पाझर तलावामुळे कोकणातील पहिली पाणी वाटप संस्था स्थापन झाली होती. या परिसरातील शेतकऱ्यांनी बारमाही शेतीची कासही धरली होती. मात्र काही वर्षातच या धरणात गाळ साचल्याने व पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिक पाइपमध्ये झाडांची मुळे जावुन ते पाइप खराब झाल्याने ही पाणी वाटप संस्था व बारमाही शेती करणारा शेतकरी काळाच्या पडद्याआड गेला.

राजापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत पाचल, तळवडे, परुळे, कोंड्ये, वाटुळ, ओझर, पांगरे, केळवली अशा अनेक गावांमध्ये शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन हे पाझर तलाव निर्माण केले आहेत. गेल्या दहा वर्षात कोकणात या सह्याद्री रांगांमध्ये बेसुमार होणारी जंगल तोड पाहता आज बहुतांशी डोंगर उघडे पडलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहत येवुन ती या पाझर तलावात साचली आहे. सर्वच पाझर तलाव आज ८० ते ९० टक्के गाळाने भरल्याने पाणी साठवण क्षमताच संपुष्टात आली आहे. या पाझर तलावात गाळाचे साम्राज्य असल्याने पाणी पाझर तलावात अडवले जाण्याऐवजी ते वाहुन जात आहे.

याच कालावधीत शासनाने करोडो रुपये खर्च करुन कोकणातील डोंगर दऱ्यांमध्ये लघु पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत या पाझर तलावाची निर्मिती केली. मात्र शासनाच्या या लघु पाटबंधारे विभागाची अनास्था व दुर्लक्ष यामुळे या पाझर तलावातील गाळ उपसण्याचे कष्ट कोणीच घेतले नाहीत. हा गाळ उपसण्यासाठी ना जनतेतुन निधीची मागणी झाली की या लघुपाटबंधारे खात्याने त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले परिणामी आज हे सगळे पाझर तलाव गाळाने पुर्ण भरुन त्यांची पाणी साठवण क्षमता पुर्णत: संपुष्टात आली आहे.

कोकणातल्या डोंगर दऱ्यांमध्ये शासनाने निर्माण केलेल्या मात्र आज गाळाने भरलेल्या या पाझर तलावातील गाळ उपसला गेला तर या पाझर तलावांची पाणी साठवण क्षमता वाढेल. पर्यायाने कोकणातील भुजल पातळीत वाढ होऊन अनेक गावांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणावर मात करता येईल. त्यासाठी आता लोक उठावाबरोबरच राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज आहे. या पाझर तलावामध्ये पाणी साचून राहिले तर त्या पाण्यावर कोकणातील शेतकरी बारमाही शेतीही करु शकेल व येथील तरुणांना स्वतःचा रोजगार उपलब्ध होईल.

Web Title: Millions of rupees percolation of silt in the lake no water for agriculture or drinking maharashtra government rajapur ratnagiri state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2024 | 04:05 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Rajapur News Update
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!
1

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”;  राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
3

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना
4

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.