उस्मानाबाद : माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन (Protest At Usmanabad ZP) करताना पोलिसांसोबत हूज्जत घातल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने कडू यांच्यासह अन्य पाच आरोपींना निर्दोष मुक्त (acquitted) केलं आहे. आमदार कडून यांची निर्दोष मुक्तता केली असली तरी त्यांना अडीच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
[read_also content=”कांद्याचा दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल, किसान सभेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ‘ही’ महत्वाची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/all-india-kisan-sabha-wrote-a-letter-to-chief-minister-about-onion-price-issue-nrsr-372744.html”]
आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये नोव्हेंबर 2015 ला आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला तीन टक्के निधी खर्च न करण्यात आल्यामुळे त्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी कडू यांच्यासह आंदोलक थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शिरले होते. यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांसोबत कडू यांनी हुज्जत घातली होती. तसेच त्यांनी अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ केली, असा आरोप करत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.मात्र त्यांना आज कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे.
याप्रकरणी धाराशिव जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव, बलराज रणदिवे यांनाही न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. आरोपींच्या वतीने वकील जे एस पठाण, वकील मिराजी मैदाड, वकील संतोष शिंदे, संजय चादरे, यांनी युक्तिवाद केला.






