Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA Redevelopment Dispute : जुन्या, धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम! 14 वर्षांपासून पुनर्विकास रखडल्याने रहिवासी न्यायालयात

मुंबईत १४ हजारांवर सेस इमारती असून त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक चाळी, इमारती जीर्ण आहेत. राज्य सरकारने जुन्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी विविध धोरणे आखली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2025 | 05:46 PM
जुन्या, धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम! 14 वर्षांपासून पुनर्विकास रखडल्याने रहिवासी न्यायालयात (फोटो सौजन्य-X)

जुन्या, धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम! 14 वर्षांपासून पुनर्विकास रखडल्याने रहिवासी न्यायालयात (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईची इतिहास, भौगोलिकदृष्ट्या वाढ होत असताना शहर भागातील जुन्या चाळी, इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरवर्षी पावसाळा आला की, मुंबईतील जुन्या, धोकादायक चाळी, इमारतींतील रहिवाशांसमोरील चिंतेचे ढग गडद होतात. जस की वरळी येथील बीडीडी चाळ येथील रहिवासी 500 फुटांच्या घरात दिवाळी साजरी करण्याचे नियोजन करीत असताना गिरगाव येथील जगन्नाथ चाळ झाऊबा वाडी येथील रहिवाशांना मात्र रखडलेल्या पुनर्वसनाचा लढा लढवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. १४ वर्षांपासून पुनर्विकास रखडल्याने विकासक आणि म्हाडाच्या कारभाराविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

महापालिका निवडणुकीत VVPAT वापरला जाणार नाही, आयोगाने सांगितले कारण, विरोधक मात्र संतप्त

९१ अ कायद्याअंतर्गत रहिवाशांनी २५ चाळी आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची मागणी केली आहे. येथे पाचशेहून अधिक कुटुंबे पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. जगन्नाथ चाळीचे रहिवासी आणि याचिकाकर्ता श्रेयस आचरेकर यांनी याप्रकरणी सांगितले की, विकासकाने हा प्रकल्प हाती घेतला असून आजपर्यंत या जागेवर कोणतेही काम झालेले नाही.

गेल्या तीन वर्षांत रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये म्हाडाला स्पष्टपणे सूचना देत विकासाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते . रहिवाशांनी वकिलांच्या माध्यमातून म्हाडा आणि संबंधित अधिकाऱ्यांना १० पत्रे पाठविण्यात आली आहेत.मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी रेखा दांडेकर यांनी केला आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिक पुनर्विकासाची प्रतीक्षेत जग सोडून गेले आहेत. चाळी आता रहिवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्व प्रशासकीय मार्ग संपल्यान रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हीच याचिका दहा लाखांहून अधिक भाडेकरांचे प्रतिनिधित्व करणारे श्रेयस आचरेकर, दीपक वैद्य, अनिमेष कर्माकर, प्रमोद देवधर आणि रेखा दांडेकर यांनी दाखल केली आहे.

प्रमुख मागण्या

  • म्हाडाने कलम ९१ अ लागू करून प्रकल्प स्वत:हाती घ्यावा.
  • प्रमाण इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेल्या सर्व एनओसी तात्काळ रद्द करावेत.
  • विकासकाला कोणतीही नवीन परवानगी देणे थांबवावे.
  • हा प्रकल्प म्हाडा किंवा अन्य विश्वासार्ह आणि पारदर्शक संस्थेकडे सोपवावा.
  • वेळेत कारवाई न करणार्‍या म्हाडा अधिकार्‍यांवर कारवाई करावी.

तर दुसरीकडे मुंबईतील वांद्रे-सायन ते कुलाबा पट्ट्यातील शहर भागात उपकरप्राप्त इमारतींची संख्या १४ हजारांपेक्षाही जास्त आहे. मुख्य म्हणजे त्यातील कित्येक बांधकामांना १०० वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास मांडला जातानाच तिथल्या बांधकामांचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे. त्यावर अद्याप तोडगा निघत नसल्याने येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते.

पोलीस हेल्पलाईनवर तब्बल ९५,००० तक्रारी, तक्रारींमध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाढ

Web Title: Girgaon chawl redevelopment pil mumbai high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • mhada
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.