Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला काहीतरी सांगायचंय’; शिंदे-ठाकरेंची लढाई आता रंगमंचावर, राजकारण तापणारं

राज्यातील सत्तांतरापूर्वी धर्मवीर सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच एकनाथ शिंदेंनी 40 आमदरांसह शिवसेना सोडली, त्यानंतर आता जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा घडामोडींनाही वेग आला आहे. विशेष म्हणजे धर्मवीर-2 सिनेमाही येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून आणि नाटकातून नेमकं काय पाहायला मिळणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 18, 2024 | 04:49 PM
‘मला काहीतरी सांगायचंय’; शिंदे-ठाकरेंची लढाई आता रंगमंचावर, राजकारण तापणारं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी सर्वात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 समर्थ आमदारांसह शिवसेना सोडली. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या या सत्तांतरानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.हे संपूूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर येणार आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या या राजकीय घडामोडींवर आधारित हे नाटक असून ‘मला काहीतरी सांगायचंय’  असं या नाटकाचे नाव आहे.

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी हे नाटक लिहीले असून शिवसेना फुटीबद्दल आणि त्या दरम्यान पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी या नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. ‘मला काहीतरी सांगायचंय’ हे एकपात्री नाटक असेल. एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित या नाटकात अभिनेता संग्राम समेळ हा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या नाटकाबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे.  सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे आहे. येत्या दोन दिवसात याबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:  मोठी बातमी! ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटकडून ग्रीन सिग्नल

गेल्या अडीच वर्षांत घडलेल्या घडामोडींनंतर राज्यात विधानभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दावे प्रतिदावे सुरू आहेत. अशातच या नाटकाची घोषणा झाल्यामुळे या नाटकात नक्की काय पाहायला मिळणार, याबाबातही उत्सुकता वाढू लागली आहे. राज्यातील सत्तांतरापूर्वी धर्मवीर सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच एकनाथ शिंदेंनी 40 आमदरांसह शिवसेना सोडली, त्यानंतर आता जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा घडामोडींनाही वेग आला आहे. विशेष म्हणजे धर्मवीर-2 सिनेमाही येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून आणि नाटकातून नेमकं काय पाहायला मिळणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा: अमरावतीत राजकारण तापलं; पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची

Web Title: Mla kaahi sangaychay eknath sambhaji shinde new marathi play based on eknath shindes rebel in 2022 will be on stage soon nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 04:49 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • entertainment

संबंधित बातम्या

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा
1

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय
2

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’
3

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी
4

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.