महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट हे आमचे मिशन आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांच्यासाठी म मराठीचा नव्हे तर मलिदा, मतलाबाचा आणि मुजोरीचा आहे. तर महायुतीसाठी म मराठीचा, महाराष्ट्राचा आणि महायुतीचा…
महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेनेचे ७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे. २९ महापालिकांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला.
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते, सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतून 35 ते 40 ठिकाणी बंडखोरी झाली आहे.
वॉर्ड १७३ मधून भाजपचे नेते दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर या भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी सादर केलेल्या अर्जासोबत डुप्लिकेट एबी फॉर्म जोडण्यात आला होता.
अर्ज सादर केल्यानंतर आज अर्ज छाननीचा दिवस आहे. दरम्यान, धुळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला.
येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 16 तारखेला निकल जाहीर होणार आहे गेले अनेक दिवस मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीमध्ये जागावाटप चर्चा सुरू होती.
मंत्री नाईक यांच्याकडील ही जबाबदारी काढून आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेचा निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आली आहे. याचं नेमकं कारण काय ?
राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असून मनसेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Mumbai News: भाषेच्या नावाखाली धमकी देणे किंवा लोकांना घाबरवणे मुंबईचं भलं होणार नाही, असे प्रत्युत्तर शायना एन.सी. यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांना दिले आहे.
Eknath Shinde Live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंची ही युती अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शिवतीर्थावर दाखल झाले होते. शिवतीर्थावर भेट देत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत आशिर्वाद घेतले
राज्यात 21 तारखेला नगरपालिका, नगरपंचयात निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने मोठे यश प्राप्त केले आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला. ७० हून अधिक नगराध्यक्ष शिवसेनेचे होतील आणि उबाठा गटाला जनतेने नाकारले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईत आयोजित शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मविआ पेक्षा शिवसेनेची ताकता मोठी असल्याचा दावा करत त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला.
सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भावाचे नाव घेण्यात आले, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत शिंदेंची पाठराखण केली.