
Mumbai water reservoirs reach 88.81 %
तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा
मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यंत पावसाचा अंदाज घेतला जाईल आढावा पाहूनच पाण्याची दिशा ठरवली जाईल तोपर्यंत १०% पाणी कपात कायम ठेवणार आहे. जुलैपर्यंत पाण्याची स्थिती चिंताजनक होती.पाणलोट क्षेत्रांत पाणीसाठा किती होईल या बद्दल शंका होती.आपण दुष्काळाच्या वाटेने तर जात नाही आहोत ना हि भीती होती पण पावसाने उशिरा का होईना महाराष्ट्रावर मेहरबानी केली.
२०२५ मध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात पडून पाण्याचा प्रश्न सोडवला होता पण २०२६ मध्ये अजून पाहिजे तसा पाऊस पडायचा बाकी आहे.पण निसर्गाकडे काही तरी चमत्कार करण्याची ताकद नेहमीच राहीली आहे त्यामुळे या वर्षी सुद्धा पाऊस महाराष्ट्राला पाण्याचा दुष्काळ दाखवणार नाही याची खात्री आहे त्याच बरोबर शेतकरी सुद्धा आनंदी असेल.
जलाशयाचा विचार केला तर गेल्या २४ तासात वैतरणामध्ये सर्वाधिक ६९ मिमी पावसाची नोंद झाली.भातसा (४८ मिमी), तानसा (४५ मिमी), मोडक सागर (२७ मिमी), मिडल वैतरण (१६ मिमी), तुळसी (८ मिमी) आणि विहार (२ मिमी) इतक्या पावसाची नोंद झाली.
अप्पर वैतरणाच्या पातळीत वाढ झाली आहे तसेच ती पातळी ०.०९ मीटर ने वाढून ६०२.०२ मीटर एवढी झाली. मोडक सागरची पातळी १६३.१६ मीटरवर स्थिर आहे.उर्वरित तलावांच्या पातळीत किरकोळ घट नोंदवली गेली. तानसाची पातळी ०.०४ मीटर, मिडल वैतरणाची ०.८१ मीटर,भातसाची ०.२६ मीटर,विहारची ०.०१ मीटरने आणि तुळसीची ०.०३ मीटरने घट झाली आहे.
Navi Mumbai: कचऱ्यात फेकलेल्या सफरचंदांचा बाजार? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार; चौकशीच्या मागणीला जोर