Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Train : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांना मंजुरी

रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वााचा निर्णय हाती घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2025 | 05:49 PM
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांना मंजुरी

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांना मंजुरी

Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते : उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी आणि त्यासोबत वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई रेल्वे पोलिसांतर्गत चार नवीन रेल्वे पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), भाईंदर, अंबरनाथ आणि आसनगाव या चार महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. गृह विभागाने यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी केला असून लवकरच ही ठाणे प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहेत.

मुंबईची उपनगरीय रेल्वे वाहतूक ही जगातील सर्वाधिक गर्दीची लोकल सेवा मानली जाते. रोज लाखो प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतात. गेल्या काही वर्षांत मिरा रोड, भाईंदर, अंबरनाथ आणि आसनगावसारख्या उपनगरी स्थानकांवरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, गर्दी वाढली तशी गुन्हेगारीची प्रकरणेही वाढली. चोरी, पाकिटमारी, छेडछाड, मारहाण, अपघात आणि लैंगिक अत्याचार यासारख्या घटनांनी पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

भाईंदर-मीरा रोड प्रवाशांचा दिलासा

मिरा भाईंदर परिसरातील प्रवाशांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. आतापर्यंत या भागातील रेल्वे गुन्ह्यांच्या तक्रारीसाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. वसईचे अंतर खूप असल्याने तक्रारदारांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होता. शिवाय, प्रत्येक वेळेस चौकशीसाठी वसई गाठणे ही डोंगराएवढी समस्या होती. यामुळे अनेक प्रवाशांनी तक्रार देण्याचे टाळले. मात्र आता भाईंदरला स्वतंत्र रेल्वे पोलिस ठाणे उभारले जाणार असल्याने हा त्रास संपणार आहे.

वसई पोलीस ठाण्याचा ताण कमी होणार

वसई रेल्वे पोलीस ठाणे हे प्रचंड कामाच्या ओझ्याखाली दबले आहे. मुंबई ते दहाणू या विस्तृत पट्ट्यातील रेल्वे स्थानकांवरील सर्व गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी वसई पोलिसांवर होती. नवीन चार पोलिस ठाण्यांमुळे वसईच्या जबाबदारीत मोठी कपात होणार आहे. परिणामी, तपासाचा वेग वाढणार असून प्रवाशांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई शक्य होणार आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल

रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षा हा कायमच चिंतेचा विषय राहिला आहे. गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड काढणे, गैरवर्तन करणे, मोबाईल किंवा बॅग हिसकावणे यासारख्या घटना सर्रास घडत होत्या. नवीन पोलीस ठाण्यांमुळे यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. स्थानकांवर गस्त वाढवली जाईल आणि महिलांसाठी तक्रार प्रक्रिया सोपी केली जाणार आहे.

चार नवीन पोलिस ठाण्यांची ठिकाणे:

1. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)
2. भाईंदर रेल्वे स्टेशन
3. अंबरनाथ रेल्वे स्टेशन
4. आसनगाव रेल्वे स्टेशन

 

जलद कार्यवाहीची अपेक्षा

राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता लवकरच या ठाण्यांचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, तांत्रिक साधनसामग्री आणि आवश्यक संसाधने लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

काय होणार फायदे?

प्रवाशांना जवळच्या ठिकाणी तक्रार नोंदवता येणार.
तक्रारींची तत्काळ नोंदणी आणि जलद तपास होणार.
महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी वाढणार.
चोरी, छेडछाड आणि अन्य गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण.
वसई पोलिस ठाण्याचा ताण कमी होणार.

रेल्वे प्रवास सुरक्षीत होण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे पाऊल एक मोठा दिलासा देणारे ठरणार आहे.

Web Title: State government major decision granted for four new railway police stations lokmanya tilak terminus bhayandar railway station ambernath railway station asangaon railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Mumbai local train
  • Mumbai Train

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Mumbai Local Mega Block: प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या! आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
2

Mumbai Local Mega Block: प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या! आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! तिकीट दर तितकाच की…? मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
3

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! तिकीट दर तितकाच की…? मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Mumbai Local Railway Accident : मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास; ८ वर्षांत अपघातांमध्ये ‘इतक्या’ लोकांनी गमावला जीव
4

Mumbai Local Railway Accident : मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास; ८ वर्षांत अपघातांमध्ये ‘इतक्या’ लोकांनी गमावला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.