Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता मुंबई ते इंदूर प्रवास होणार अधिक जलद, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी

रेल्वे देशाला जोडण्यात एक महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यामुळेच केंद्र सरकार नेहमीच भारतीय रेल्वेचे जाळे जास्तीत जास्त पसरवण्याचा प्रयत्न करत असते. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दर्शवली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 02, 2024 | 08:20 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:

मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या प्रकल्पाचा एकूण खर्च रुपये 18 हजार 036 कोटी असून, तो 2028-29 सालापर्यंत पूर्ण होईल.

प्रधानमंत्री मोदी यांची “नव भारत” संकल्पना साकार होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला आज मंजुरी दिली. ह्या प्रकल्पाव्दारे मनमाड-इंदूर च्या प्रस्तावित नवीन व लहान रेल्वेमार्गाने दोन्ही राज्यांमध्ये व्यापार महत्वाचे बदल होतील. तसेच याद्वारे प्रधानमंत्री मोदी यांची “नव भारत” ची संकल्पना पूर्ण होण्यास मदत होईल.

हे देखील वाचा: गोरेगावमध्ये दुचाकीची खांबाला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू

दोन्ही राज्यांचा विकास

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील या प्रकल्पाअंतर्गत सहा जिल्ह्यांचा समावेश असेल आणि भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जाळ्यामध्ये सुमारे 309 किलोमीटरची भरही पडेल. या प्रकल्पामुळे 30 नवीन स्थानके बांधली जातील. या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे सुमारे 1,000 गावे आणि सुमारे 30 लाख लोकसंख्येला जोडली जाऊ शकतील.

या प्रक्लपामुळे कोणता फायदा होईल?

या प्रकल्पामुळे देशाच्या पश्चिम/नैऋत्य भागाला मध्य भारताशी जोडणारा एक लहान मार्ग उपलब्ध करून देऊन या प्रदेशातील पर्यटनालाही चालना मिळेल. या नव्या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील पर्यटक विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना सहजरित्या भेट देता येतील.

हे देखील वाचा: “…त्यामुळे आज तुमच्या मनातील सावरकर द्वेष सर्वांसमोर आला आहे”; हिंदुत्वावरून भाजपचे ठाकरेंवर टीकास्त्र

मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना थेट संपर्क उपलब्ध होईल. तसेच देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात त्याचे वितरण सुलभ होईल. यामुळे रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध तर होतीलच पण दोन्ही राज्यातील नागरिकांना, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.

या प्रकल्पामुळे पीथमपूर ऑटो क्लस्टरला, जेएनपीएच्या गेटवे बंदराला आणि इतर राज्य बंदरांना थेट जोडले जाऊ शकते. मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना थेट संपर्क उपलब्ध होईल. तसेच देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात त्याचे वितरण अधिक सुलभ होईल.

Web Title: Union cabinet approves the mumbai indore new railway project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 08:20 PM

Topics:  

  • indore news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार
1

Mumbai News: आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार
2

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त
3

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

HCL आणि SRFI चा मोठा धमाका! आंतरराष्ट्रीय Squash ची रणधुमाळी; विजेत्याला १५,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस
4

HCL आणि SRFI चा मोठा धमाका! आंतरराष्ट्रीय Squash ची रणधुमाळी; विजेत्याला १५,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.