
Nanded private coaching classes
Private coaching classes Scam: राज्यातील खासगी नीट आणि जेईई कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यावसायिकीकरणाविरोधात पालक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून ‘सर्व खासगी क्लासेस बंद झाले पाहिजेत’ अशी मागणी जोर धरू लागली आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत केवळ निवडक विद्यार्थ्यांच्या हजार यशाच्या जोरावर कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पालकांनी मांडलेल्या मुद्दयांनुसार, सुमारे १० विद्यार्थ्यांमधून केवळ ५० विद्यार्थी नीट किवा जेईईमध्ये यशस्वी होतात, म्हणजेच यशाचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षाही कमी असताना याच ५० विद्यार्थ्यांच्या फोटो आणि जाहिराती करून उर्वरित ९ हजार ९५० विद्यार्थी व त्यांच्या पालकांची दिशाभूल केली जाते, असा आरोप आहे. तसेच दहावी बोर्ड परीक्षेत ५० ते ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध मार्गांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे चित्र निर्माण करून पालकांना डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची मोठी स्वप्ने दाखवली जातात, त्यानंतर लाखो रुपयांची फी आकारून प्रवेश घेतला जातो.
काही क्लासेसकडून जेईई किया नीटमध्ये यशस्वी झालेल्या इतर संस्थांतील विद्यार्थ्यांना मोठ्या रकमांचे आमिष दाखवून ‘हे विद्यार्थी आमच्या क्लासचे होते’ अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असत्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. डेमो चलासदरम्यान नामांकित प्राध्यापक शिकवतात, मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभरातच शिक्षक बदलले जातात, अशीही गंभीर तक्रार पुढे आली अहे. तसेच १० हजार विद्याश्यांपैकी केवळ २५ से ५० हुशार विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैंच करून त्यांनाच सर्व सुविधा दिल्या जातात. तर उर्वरित हज्जारी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असेही सांगण्यात आले.
याशिवाय काही क्लासेसकडून पालकांची आर्थिक परिस्थिती पाहून ‘गैस पेपर’ ‘विशेष मार्गदर्शन’ किंवा ‘गुप्त तयारी साहित्य यांच्या नावाखाली लाखो रुपयांची अतिरिक्त वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्त फी असलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडून संबंधित संस्थांकडून कमिशन घेतले जात असल्याचाही दावा करण्यात आला. ‘मुलगा हुशार आहे पण अभ्यास करत नाही’, ‘आता थोडेथोडके मार्क वाढत आहेत, ‘मित्रांमुळे मागे पडला आहे’ अशी कारणे सांगून पालकांना मानसिकदृष्ट्या गुंतवून ठेवले जाते आणि फी वसूल केली जाते, अशी नाराजीही व्यक्त होत आहे.
दरम्यान, मोठमोठ्या जाहिराती, पेड न्यूज आणि खोट्या प्रसिद्धीच्या माध्यमातून पालकाना आकर्षित केले जात असल्याचे सांगण्यात आले. अनेक पालक मुलाच्या भविष्यासाठी घर, शेती विकून किया कर्ज काढून लाखो रुपयांची फी भरतात.