Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sadabhau Khot News: नाशिक विरोधकांचे कर्जमाफीवर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू – सदाभाऊ खोत यांचा घणाघात

माझ्यावर 263 गुन्हे दाखल आहेत. हे सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहेत. काही गुन्हे तर असे की आम्ही आंदोलनस्थळी आहोत हे गृहीत धरून दाखल केले गेले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 05, 2025 | 02:10 PM
Sadabhau Khot News: नाशिक विरोधकांचे कर्जमाफीवर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू – सदाभाऊ खोत यांचा घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : “विरोधकांनी कर्जमाफीमाफी बाबत बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत.  पण हेच ‘हेच विरोधक सत्ता असताना शेतकऱ्यांचे हाल करीत होते, आणि आता शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दर्शवत आहेत.  असा टोला लगावत शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

कांद्याच्या दरवाढीबाबत त्यांनी आठवण करून देत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 2020 साली कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होत. ते आंदोलन पूर्णतः शांततेत झालं. कोणतंही आर्थिक नुकसान झालं नव्हतं. पण त्यावेळी सरकारने आंदोलन चिरडण्याचा विडा उचलला,” असा गंभीर आरोप खोत यांनी केला. सदाभाऊ खोत म्हणाले की, “त्यावेळी नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील होते. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की एवढे किरकोळ कलम का लावले? शेतकरी पोरं अधिकारी झाली की मस्तवाल कशी होतात याचे उदाहरण म्हणजे सचिन पाटील.”

सदाभाऊ खोत म्हणाले की, “नंतर काही प्रकरणांत अडकलेले तेच अधिकारी लाळ घोटत माझ्याकडे आले होते.” त्यांनी स्पष्ट केलं की, न्यायालयाने खासदार आणि आमदारांवरील खटल्यांचा वेगाने निपटारा करण्याबाबत निरीक्षण नोंदवले आहे आणि याच न्यायप्रक्रियेचा आम्ही अवलंब केला आहे.

Jammu-Kashmir News: कश्मीरमध्ये पुन्हा हल्ल्याची तयारी? मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त, नेमकं चाललयं काय

माझ्यावर 263 गुन्हे दाखल आहेत. हे सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहेत. काही गुन्हे तर असे की आम्ही आंदोलनस्थळी आहोत हे गृहीत धरून दाखल केले गेले. विस्थापितांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार नाही, म्हणूनच हे गुन्हे दाखल करण्यात आले. हे नेते नव्हतेच, हे शेतकऱ्यांचं खळ लुटणारे लोक होते. मात्र, आम्ही न्यायालयात आमची बाजू ठामपणे मांडली आहे. हा देश संविधानावर चालतो आणि कायद्यावर आमचा ठाम विश्वास आहे. अंतिम सुनावणी वारंवार पुढे ढकलली जाते, हे लक्षात घ्यावे लागेल.” अंसही त्यांनी नमुद केलं

 महाविकास आघाडीवर प्रश्न

महाविकास आघाडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण दिल्याबाबत विचारले असता खोत म्हणाले, “त्यावेळी तुम्ही त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही? फक्त हवेतले बार उडवायचे, अशीच परिस्थिती आहे.” त्यांनी टोला लगावला की, “पाच वर्षे चिंता करण्याचे कोणतेही काम नव्हते, आणि आता फटाक्यांप्रमाणे सांगत आहेत की ‘आमच्या निवाऱ्याला उभे रहा’.राज्याच्या निधी वाटपाच्या मुद्द्यावरूनही सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. “राज्याचं मुख्यमंत्रिपद आज एका अभ्यासू नेत्याकडे आहे. सरकारकडून निधी जनतेच्या विकासासाठी दिला जातो. ‘निधी थांबवण्यात आला’ असे म्हणण्यात काही अर्थ नाही,” असे खोत यांनी स्पष्ट केले.

दहशतवाद्यांना मदत केलेल्या आरोपीची नदीत उडी; कुटुंबियांचे लष्करावर गंभीर आरोप, व्हिडिओ आला समोर

खोत पुढे म्हणाले, “प्रत्येक आमदार, खासदाराला नियोजित प्रमाणात निधी दिला जातो आणि त्यातला उर्वरित निधी पुन्हा वर्ग केला जातो. बजेट म्हणजे एखाद्याच्या हातात रोख रक्कम नसते, ते एक नियोजन असतं. शेतकरी सुद्धा आपलं आर्थिक नियोजन करत असतो, पण पाऊस न पडल्यास त्याचे गणित कोलमडते. त्याचप्रमाणे विकास योजनांचेही नियोजन असते.” ते म्हणाले की, “सर्व योजना, निधी आणि त्याचे कार्यान्वयन ही सामुदायिक जबाबदारी आहे. निधी असा कुणाच्या सांगण्यावरून वळवता येत नाही. डब्यात हात घालून पैसे काढता येत नाहीत, त्यामागे प्रक्रियाशील यंत्रणा असते.”

Web Title: Nashik oppositions talk about loan waiver is like crocodile tears sadabhau khots attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • Farmers Issues
  • sadabhau khot news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.