Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आरक्षण संपवण्याची कोण भाषा करत असेल तर छातीचा कोट करुन उभा राहीन”, नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

आरक्षणावरुन काँग्रेसनेते राहूल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आज कणकवलीमध्ये महायुतीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. आरक्षण संपण्याची हिंमत करणाऱ्यांपुढे मी छातीचा कोट करुन उभा राहीन असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 05, 2024 | 06:56 PM
"आरक्षण संपवण्याची कोण भाषा करत असेल तर छातीचा कोट करुन उभा राहीन", नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

"आरक्षण संपवण्याची कोण भाषा करत असेल तर छातीचा कोट करुन उभा राहीन", नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

( भगवान लोके ) कणकवली : राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून गेलं आहे. देशभरात याचे तीव्र पडसाद उमटत असतानाच कणकवलीत महायुतीकडून आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली. आमदार नितेश राणे म्हणाले की, आरक्षण बचाव रॅली ही काय राजकीय रॅली नाही .मात्र विरोधी पक्षनेते , राहुल गांधी अमेरिकेत जाऊन देशातील आऱक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. म्हणून ही रॅली महायुतीकडून काढण्यात आली आहे. देशातील आरक्षण संपवण्याची कुणीही हिंमत करु शकणार नाही. राहुल गांधीना लोकसभेत झालेले मतदान पाहून अहंकार चढला आहे. त्यामुळेच कॉंग्रेस सत्तेवर आल्यास आऱक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. परंतु आंबेडकरी जनतेला आम्ही विश्वास देतो की , आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष आणि देशात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. तोपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नाही. मी या भागाचा आमदार म्हणून आरक्षण संपवण्याची कोण भाषा करत असेल, तर छातीचा कोट करुन आपल्या सोबत उभा राहीन, असा विश्वास आ. नितेश राणे व्यक्त केला.

हेही वाचा- मुंबई मेट्रो लाईन 3 चे मोदींच्या हस्ते लोकार्पण, बीकेसी मेट्रो स्टेशनवरुन दाखवला हिरवा झेंडा

कणकवली येथील आरक्षण बचाव रॅली जानवली पुल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महायुतीच्या वतीने काढण्यात आली. यावेळी बौध्द विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आ. नितेश राणे म्हणाले , लोकसभा निवडणूकीत मोदी सरकार आले तर , संविधान संपवणार असा खोटा प्रचार विरोधकांनी आंबेडकरी जनतेच्या वाडी , वस्त्यांवर जावून केला. त्यात काही मुंबईतील कार्यकर्ते देखील प्रचार करत होते. परंतु राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा या लोकांनी कुठेही निषेध केलेला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलणार अस वक्तव्य केलं असेल तर असा एकतरी पुरावा दाखवा. 2024 मध्ये लोकसभेत कॉंग्रेसला भोळ्या-बाबड्या लोकांनी मतदान केलं त्यामुळे राहुल गांधीमध्ये अहंकार चढला आहे. राहुल गांधींची चे भाषण पहावे ,देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेव्हा मी सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवून टाकेन असे बोलत आहेत.आरक्षण रॅली बचाव आटपून घरी जात असताना नक्की विचार करा.आरक्षणामुळे समाजामध्ये बसण्याचा आणि भाषण करायचा अधिकार आपल्याला मिळाला आहे. हे विसरुन चालणार नाही.

हेही वाचा- बारामतीत प्रहार संघटना आक्रमक; अजित पवारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

आरक्षण बचाव रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित आहात,काँग्रेस नेते राहुल गांधी आरक्षण संपवून टाकू,असे वक्तव्य करतात,त्याची दखल आरक्षण बचावासाठी आम्ही घेतली आहे.आपण राजकीय रॅली काढली असे नाही.आता लोकसभेला मतदान केलं,आता विधानसभा आणि त्यानंतर जिल्हापरिषद आणि पंचायत समिती साठी मतदान करणार आहोत. मतदान करीत असताना विचार केलं पाहिजे. कॉग्रेस नेते राहूल गांधीने वक्तव्य केलं तेच मोदी यानी केलं असत तर आरक्षण गेलं म्हणून सांगण्यासाठी वाड्या – वस्त्यांवर आले असते.लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपा सत्तेवर आले तर हक्काचे संविधान ते बदलणार असे सांगितले.आपण त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला. नरेंद्र मोदी यांनी 400 पार ची आपण घोषणा का दिली ? केंद्रात स्थिर सरकार असेल तर हक्काचे निर्णय घेवू शकले असते.2014 ते 2024 कालावधी स्थिर सरकार दिल्याने देशात चांगल्या योजना राबविण्यात आल्या.कधीतरी त्याचा विचार आपण केला पाहिजे. असेही नतिश राणे म्हणाले.

 

 

Web Title: Nitesh ranes statement about reservation if anyone talks about ending reservation i will stand with a coat on my chest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 06:56 PM

Topics:  

  • Kankavli
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे
1

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.