अनेक महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, आपल्यावर सातत्याने छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि आरोपींना ताब्यात घेतले.
एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होत असलेली मासेमारी रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी द्याव्या, असे नितेश राणे म्हणाले.
बागायतदार शेतकरी रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही. सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे. ती सगळ्या पद्धतीची मदत केली जाणार आहे, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
तळकोकणातील आंबा बागायतदार आंब्याच पीक कमी आल्याने चिंतेत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यांवर टीका केली. मुस्लीम समाजाला वारंवार लक्ष्य करणे अयोग्य असल्याचे सांगत मदरशांबाबत चुकीची माहिती...
कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. पुढील शिवजयंतीला मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले.
‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाला नितेश राणे हे देखील जाहीर पाठिंबा देताना दिसले आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली दिली. ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली.
नितेश राणे म्हणाले की सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल म्हटले की राहुल गांधींसमोर त्यांच्या वडिलांना "हिंदू हृदय सम्राट" म्हणण्याची हिंमत त्यांच्यात नाही.
देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री सुद्धा भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रतिनिधी देखील भाजपचाच असायला हवा.
कोल्हापूर-वैभववाडी या ६ हजार ५०० कोटीच्या रेल्वे प्रकल्यासाठी केंद आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार असून ३ हजार २४४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
ए.आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही' असा इशारा देत त्यांनी नेटफ्लिक्सला खडे बोल सुनावले.
गेटवे ऑफ इंडिया येथील धक्क्यावरील जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने रेडीओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का बांधण्याच्या निर्णय घेतला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ९९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे.या विजयानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.