Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जांभूळाचे उत्पन्न घटणार : जांभूळ उत्पादक शेतकरी, विक्री करणाऱ्या महिला संकटात

निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व वातावणातील बदल तसेच अवकाळी पाऊस याचा यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू उत्पादना बरोबरच काळया भोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झालेला असून त्याचा परिणाम दिसून येत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 11, 2025 | 11:38 PM
जांभूळाचे उत्पन्न घटणार : जांभूळ उत्पादक शेतकरी, विक्री करणाऱ्या महिला संकटात

जांभूळाचे उत्पन्न घटणार : जांभूळ उत्पादक शेतकरी, विक्री करणाऱ्या महिला संकटात

Follow Us
Close
Follow Us:

निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व वातावणातील बदल तसेच अवकाळी पाऊस याचा यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू उत्पादना बरोबरच काळया भोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झालेला असून त्याचा परिणाम दिसून येत आहे. या वर्षी उशिराने जांभूळ पिकले असून, जांभूळ हंगामा उशिराने सुरु झाला आहे.

गावरान जांभुळ अद्यापही में महीना आला तरी पाहिजे त्या प्रमाणात जांभळे पिकले नसल्याने जांभळाची प्रतिक्षी जुनच्या पहिल्या आठवड्‌यापर्यंत करावी लागेल. यामुळे विक्रमगड परिसरातील नागरिक जांभळाची प्रतिक्षा करीत आहेत. त्यातच गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळवारा यामुळे जांभूळ पिकावर मोठा परिणाम झाला असून, तयार व्हायला आलेली जांभळे गळून गेली आहेत. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणातजांभूळ बाजारात दाखल झाली नाहीत. दरवर्षी हा गावरान जांभळे बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चालेला आहे. त्यात अवकाळी पाऊस त्यामुळे जांभुळ उत्पादन हवे आहे ते होत नसुन त्याला पिकण्याचा उत्पादनाचा कालवधी लांबत जाउन जुन उजाडतो व जांभळे खराब होउन शेतकऱ्यांना बागायतदारांना नुकसान सहन करावे लागते.

अवकाळीने जांभळाचा मोहोर लांबला

साधारण पणे जानेवारी महिन्यात जांभळांच्या झाडांना मोहर येत असतो. परंतु यंदा मोहर लांबला तसेच मोहर गळला फळधारना झाल्यावर लहान कळी गळून पडले, असे अनेक नुकसान दायी प्रकार घडले. त्यामुळे जांभळाच्या उत्पादनास जुन उजाडणार व पावसाला सुरुवात झाली म्हणजे जांभळाचे भाव पडलेले असतात, जांभळे खराब होवुन अखेर फेकून द्यावे लागणार आहेत, अशी परिस्थिती येणार आहे.

जांभूळ विक्रेत्या महिलांचा रोजगार हिरावला

जांभळाचे उत्पादनासाठी पोषक वातारण मिळत नसल्याने गावरान जांभळे यावशींही दुर्मिळ झालेला आहे. गेल्या दोन-चार वर्षांपासून जुनी जांभळाची झाडेही कमी झालेली आहेत. शिल्लक राहिलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत.

में व जुन या उन्हाळी दोन महिन्यांतव हा व्यवसाय चालत असतो, बागयतदारांना जांभुळ पिकापासून या दोन महिन्यांत ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळते. तर आदिवासी खेड्यापाड्यातील जंगल भागातील महिला भरलेल्या जांभळाच्या टोपल्या विकून याच दोन महिन्यांत १५ ते २० हजार रुपये कमवत असतात.

परंतु, बंदा रोजगार हिरावला आहे. दिक्स उगवला का पहाटेच या महिला परातून निघून शहराकडे जांभळे करंडधात भरून विकण्यासाठी वसई-विरार, नालासोपारा, मीरा-भायंदर, पालघर, कल्याण, भिवंडी या मोठ्या शहरांकडे जात असतात.

शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका

पूर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही.

त्यामुळे गावरान जांभाळाया पहिल्याप्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झालेले आहे. या वर्षी हवामानातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे आंबा काजू उत्पादनाप्रमाणेच जांभळालाही उशिराने मोहर आला. त्यामुळे हंगाम उशिराने सुरु झाला असून जांभळाचे उत्पादन व मिळणारा पैसा येथील बागायदारांना कमी मिळणार आहे.

जांभुळ व्यवसाय वातावरणातील होत असलेला सततच्या बदलामुळे फक्त मे महिन्याचा शेवटचा आठवडा व जनच्या सुरुवातीला चालणार असल्याने शेतकऱ्याऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

Web Title: Climate change and unseasonal rains affected jamun crop latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 11:29 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • agriculture
  • Business News

संबंधित बातम्या

Condom बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात दिला ५००% परतावा; प्रमोटरने उचललं मोठं पाऊल, काय होणार परिणाम?
1

Condom बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात दिला ५००% परतावा; प्रमोटरने उचललं मोठं पाऊल, काय होणार परिणाम?

Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे १०० आउटलेट्स भारतात उभारणार
2

Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे १०० आउटलेट्स भारतात उभारणार

CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल
3

CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल

ब्रिजस्टोन इंडियातर्फे शिक्षण क्षेत्रात महत्वाचं पाऊल; जैवविविधता प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सेंटरची उभारणी
4

ब्रिजस्टोन इंडियातर्फे शिक्षण क्षेत्रात महत्वाचं पाऊल; जैवविविधता प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सेंटरची उभारणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.