Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan War : भारत-पाकिस्तान तणाव; पंढरपूर पोलिसांनी सुरक्षा वाढवली

भारत- पाकिस्तान सिमेवर सुरू असलेल्या धुमशचक्रीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, पोलिसांनीही पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील सर्व संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2025 | 01:07 PM
India-Pakistan War

India-Pakistan War

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : भारत- पाकिस्तान सिमेवर सुरू असलेल्या धुमशचक्रीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, पोलिसांनीही पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील सर्व संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक, मंदिर परिसर, तालुक्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे व महत्त्वाच्या प्रशासकीय इमारती अशा अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक पोलिस, विशेष पोलिस दले, निमलष्करी दलातील जवान, या ठिकाणी पहारे देत आहेत. रेल्वे पोलिसांनीही सर्वच स्थानकांवर सुरक्षा कडक केली असून, स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसह प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे.

युध्दस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, जिल्हयातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी सूचना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने नागरिकांमध्ये जनजागृती करून, अफवांना आळा घालावा, चुकीच्या माहितीचे त्वरित खंडन करावे, असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानक, पंढरपूर विभागात सुरक्षा वाढवली

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर विभागात व्यापक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. पंढरपूर रेल्वे स्टेशन व मंदिर परिसर हे संवेदनशील ठिकाण म्हणून ओळखले जाते. पंढरपूर रेल्वे स्टेशन व मंदिर परिसरात अतिरिक्त निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांकडून (जीओ) नियमित अचानक तपासणी केली जात आहे आणि सीसीटीव्ही फुटेजचे सतत निरीक्षण केले जात आहे.

पंढरपूर पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ जागृत

पोलिसांनी शहर आणि तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली असून, शहरात प्रखर प्रकाश झोत (बीम लाईट, लेझर बीम लाईट) सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पंढरपूर शहरात पंढरपूर पोलिस, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आदी यंत्रणांचा सहभाग असलेले ‘मॉकड्रील’ शहरात पार पडले. पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातील गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक, तसेच मॉल, चित्रपटगृहांच्या परिसरात देखील संभाव्य व आपत्कलिन परिस्थितीला सामोरे कसे जायचे, याची प्रात्यक्षिके सादर केली. गुरुवारी रात्रीपासूनच शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरीकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Pandharpur police have increased security due to india pakistan tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • india pakistan war
  • Pandharpur News
  • PM Narendra Modi
  • vitthal mandir

संबंधित बातम्या

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
1

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज
2

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
3

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव
4

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.