Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष उलटली तरी देखील ‘हे’ गाव मूलभूत सुविधापासून वंचित, अखेर वन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय

खडई आणि करंबेळी ठाकुरवाडीतील आदिवासींचा वनवास संपणार आहे. यामागील कारण म्हणजे अखेर रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वन जमिनीच्या प्रस्तावला वन विभागाकडून मजुरी मिळाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 13, 2025 | 08:51 PM
खडई धनगरवाडी आणि करंबेळी ठाकुरवाडी रस्त्यासाठी वनजमिनीचा प्रस्ताव मंजूर

खडई धनगरवाडी आणि करंबेळी ठाकुरवाडी रस्त्यासाठी वनजमिनीचा प्रस्ताव मंजूर

Follow Us
Close
Follow Us:

खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडी आणि करंबेळी ठाकुरवाडी या दोन आदिवासी वाड्यांसाठी रस्त्यासाठी लागणाऱ्या वनजमिनीचा प्रस्ताव अखेर वन विभागाकडून मंजूर झाला आहे. मागील चार वर्षांपासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हे यश मिळाले असून, त्यामुळे पिढ्यानपिढ्यांचा वनवास अखेर संपणार आहे.

मुंबईपासून केवळ काही अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील या दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थ स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही रस्ता आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित होते. रस्त्यासाठी वनजमिनीचा प्रस्ताव सादर करूनही, खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी तीन वर्षांपासून प्रस्तावात वारंवार त्रुटी काढण्यात येत होत्या. पूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे पाठवला जात नव्हता.

HSRP Plate: नंबरप्लेट बदलण्याच्या प्रक्रियेला वाहनधारकांचा अत्यल्प प्रतिसाद; मिळाली चौथ्यांदा मुदतवाढ

खालापूर तहसील कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी संतोष ठाकूर यांना “तात्काळ निर्णय घेतला जाईल” असे लेखी आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नव्हती. या निष्क्रियतेमुळे दोन्ही वाड्यांना रस्त्यासारखी मूलभूत सुविधा मिळू शकली नव्हती.

यामुळे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि ‘रायगड भूषण’ पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संतोष घाटे, यशवंत माडे, पांडू हिरवा तसेच वाड्यातील आदिवासी बांधवांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. “वनजमीन स्थानांतर प्रक्रियेस मान्यता मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवू” असा निर्धार त्यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभय चव्हाण यांनी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावली. अधिकाऱ्यांमधील असमंजसपणामुळे आदिवासींना मूलभूत सुविधा मिळण्यास झालेल्या विलंबावर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंते, गटविकास अधिकारी आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करत आठ दिवसांची कालमर्यादा ठरवून उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

तहसीलदारांच्या या निर्णायक भूमिकेनंतर सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा उपवनसंरक्षक यांनी दोन्ही वाड्यांच्या वनजमीन प्रस्तावास मंजुरी दिली. उजलोली ते करंबेळी ठाकुरवाडी रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे दीड कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश आधीच निघाले असल्याने, पुढील काही दिवसांतच रस्त्याचे काम सुरू होणार असून, ७८ वर्षांचा वनवास अखेर संपणार आहे.

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान

या लढ्यात सक्रिय पाठिंबा देणारे राजकीय नेते, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच आंदोलनाची दखल घेऊन वारंवार बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकार बांधवांचे संतोष ठाकूर यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच, खालापूर तालुक्यात अजूनही १६ आदिवासी वाड्या अशाच परिस्थितीत असल्याचे सांगत, त्यांच्यासाठीही न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Proposal for forest land required for khadai dhangarwadi and karambeli thakurwadi roads approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 08:51 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?
1

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले
2

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात
3

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!
4

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.