
राशीस्वामी आणि त्या त्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांचा आशिर्वाद देखील आपल्यावर असतो त्यामुळे यांची उपासना करणं देखील गरजेचं आहे.
मेष आणि वृश्चिक
या दोन्ही राशींता स्वामी मंगळ असल्याने यांचा स्वभाव धाडसी आणि स्पष्टवक्ता असा असतो. या माणसांच्या आयुष्यात त्यांची स्वत:ची अशी काही तत्व असतात ज्यामुळे अनेकदा ही माणसं समोरच्याला तोडतात. या राशींची ईष्टदेवता हनुमान आहे. यांनी हनुमानाची उपासना करावी असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
वृषभ आणि तूळ
वृषभ आणि तूळ या दोन्ही राशींचा राशी स्वामी शुक्र असल्याने ही माणसं फार संवेदनशील आणि कलाप्रेमी असतात. या मंडळींनी लक्ष्मी आणि दुर्गेची उपासना केल्यास शुभशिर्वाद मिळतात.
मिथुन आणि कन्या
या दोन्ही राशींच्या मंडळींचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध म्हणजे बुद्धीचा कारक या अर्थाने पाहिलं तर ही माणसं फार ज्ञानी असतात. म्हणूनच जर यांनी बुद्धीदाता श्री गणेशाची उपासना करावी.
कर्क
कर्क राशीची माणसं हळव्या स्वभावाची असतात. या माणसांचा राशीस्वामी चंद्र असल्याने ही शांत आणि समदजूतदार वृत्तीची असतात. या मंडळीचा राशी स्वामी चंद्रदेव असल्याने यांनी महादेवांची उपासना करायलाच पाहिजे, असं शास्त्रात सांगितलं आहे.
सिंह
या राशीच्य़ा मंडळींचा राशीस्वामी ,सूर्य असल्याने यांचा स्वभाव सूर्यासारखा तेजस्वी असतो. यांनी गायत्री देवी आणि हनुमानाची उपासना केली तर शुभफळ मिळतं.
धनू आणि मीन
या राशीचा स्वामीग्रह हा गुरु येतो. ही माणसं अत्यंत वैचारिक असतात. त्यांच्या बुद्धीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतं. यांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना करावी.
मकर आणि कुंभ
मकर आणि कुंभ राशीचा राशीस्वामी शनी आहे. शनीची रास असल्याने ही माणसं अतिशय मेहनती असतात त्यामुळे यांनी हनुमानची उपासना जरुर करावी.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.