Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या सचिन सावंतांची भाजपवर जोरदार टीका; म्हणाले, “पराभवाच्या भीतीने ते आता हिंदु-मुस्लिम मतांचे…”

बटेंगे तो कटेंगे असे पंतप्रधान म्हणत आहेत. भाजपच्या सर्वांनीच त्यांच्या पक्षाची घटना वाचून पहावी, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2024 | 03:40 PM
काँग्रेसच्या सचिन सावंतांची भाजपवर जोरदार टीका; म्हणाले, "पराभवाच्या भीतीने ते आता हिंदु-मुस्लिम मतांचे..."

काँग्रेसच्या सचिन सावंतांची भाजपवर जोरदार टीका; म्हणाले, "पराभवाच्या भीतीने ते आता हिंदु-मुस्लिम मतांचे..."

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: केंद्रांमध्ये व नंतर राज्यातही भारतीय जनता पक्षाचीच सलग १० वर्षे सत्ता आहे, तरीही हिंदू खतरेमें कसे काय, असा प्रश्न करत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्ष आता हिंदु-मुस्लिम करत मतांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सावंत यांची काँग्रेस भवनमध्ये शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळेस सचिन सावंत म्हणाले, लोकसभेचे संविधान बदलाचे वातवरण बदलले आहे, असे भाजप स्वत:च सांगत आहे.

मात्र इतक्या दिवसांच्या प्रचारात तसे काहीही झालेले नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच आता मतांचे धर्मयुद्धसारख्या गोष्टी देवेंद्र फडणवीस करत आहेत. बटेंगे तो कटेंगे असे पंतप्रधान म्हणत आहेत. भाजपच्या सर्वांनीच त्यांच्या पक्षाची घटना वाचून पहावी. त्यात स्पष्टपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर विश्वास व महात्मा गांधी यांना आदर्श मानून असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस घटनात्मक पदावर आहेत. ते पद स्वीकारताना त्यांनी घटनेची शपथ घेतली. त्याला विसंगत असे ते वागत आहेत.

मतांचे धर्मयुद्ध यातील धर्मयुद्ध या शब्दाला आक्षेप घेत सावंत म्हणाले, कौरव पांडव यांच्यात झाले ते धर्मयुद्ध होते. त्यात दोन्ही पक्ष सनातनी हिंदूच होते. याचा अर्थ धर्मयुद्ध हा शब्द नीती-अनीती या अर्थाने वापरण्यात आला. फडणवीस मात्र तो हिंदू-मुस्लिम या अर्थाने वापरत आहेत. ते घटनेच्या विरोधी आहे. आम्ही याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. त्याशिवाय आता दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये मधूनच एखादा रस्ता दाखवत त्यावर लाडकी बहीण योजनेचा फलक दाखवतात. तीच मालिका ओटीटीवर दाखवताना त्यात मात्र फलक नसतो. आचारसंहितेपासून पळवाट काढण्यासाठी भाजप हे करत असल्याची टीका सावंत यांनी केली.

‘बटेंगे तो कटेंगे’- योगी  आदित्यनाथ 

‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा समाचार घेतला. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळगंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. त्यांच्या प्रेरणेतून देश व समाजासाठी कार्य केले जात आहे.

हेही वाचा: आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात ! योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात

आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात आहे. ते लव जिहाद, लँड जिहाद सारख्या प्रकाराला प्रोत्साहन देतात. त्यामुळे चुकूनही त्यांचा विचार करू नका. अन्यथा आपले सण गणेशोत्सव, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होईल. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारताच्या सीमा सुरक्षित आहे. ५०० वर्षांत जे कार्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारून झाले. हा डबल इंजिन सरकारचा लाभ आहे. सर्व समस्यांचे समाधान केवळ डबल इंजिन सरकार असू शकते, असे देखील ते म्हणाले.

 

Web Title: Congress spokeperson sachin sawant criticize to bjp about batenge to katenge subject

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 03:40 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Pune
  • sachin sawant

संबंधित बातम्या

Pune Crime: आंदेकर टोळीचा ‘जेलमधून सुटकेचा’ प्लान फेल; कोर्टाने ऑनलाइन उपस्थितीच दिली, जामीनही नाकारला
1

Pune Crime: आंदेकर टोळीचा ‘जेलमधून सुटकेचा’ प्लान फेल; कोर्टाने ऑनलाइन उपस्थितीच दिली, जामीनही नाकारला

Railway News  : पुणेकरांसाठी मोठी संधी! ‘भारत गौरव’ ट्रेनने ५ तीर्थक्षेत्रांचे मिळणार दर्शन
2

Railway News : पुणेकरांसाठी मोठी संधी! ‘भारत गौरव’ ट्रेनने ५ तीर्थक्षेत्रांचे मिळणार दर्शन

Railway News : पुणे रेल्वे स्थानकाला RPF जवानांचे सुरक्षा कवच; हरवलेल्या ४१२ मुलांना केले पालकांकडे सुपूर्त
3

Railway News : पुणे रेल्वे स्थानकाला RPF जवानांचे सुरक्षा कवच; हरवलेल्या ४१२ मुलांना केले पालकांकडे सुपूर्त

Railway News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाराणसीसाठी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजूरी
4

Railway News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाराणसीसाठी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजूरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.