Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : 900 एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका; खारबंदिस्ती वाहून जाण्याची भिती

तालुक्यातील खारेपाट भागातील कणे - कोप्रोलीमध्ये ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खारबंदिस्ती वाहून जाण्याची भीती वाढली असून ही बंदिस्ती वाहून गेली तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते अशी भिती व्यक्त केले जातेय.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 05, 2025 | 01:35 PM
Raigad News : 900 एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका; खारबंदिस्ती वाहून जाण्याची भिती
Follow Us
Follow Us:

पेण/विजय मोकल : तालुक्यातील खारेपाट भागातील कणे – कोप्रोलीमध्ये ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खारबंदिस्ती वाहून जाण्याची भीती वाढली असून ही बंदिस्ती वाहून गेली तर परिसरातील जवळपास नऊशे एकर जमीन पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठेकेदाराने हे काम जरी निकृष्ट दर्जाचे केले असले तरी त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील तेवढीच जबाबदारी होती, त्यामुळे हा जो धोका निर्माण झाला आहे त्याला अधिकारी देखील जबाबदार असल्याचे येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

पेण तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकऱ्यांची भातशेतीचे पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी अगदी पूर्वीपासून खारबंदिस्ती ही संकल्पना राबवली जात आहे. पूर्वी स्थानिक ग्रामस्थ स्वतःच्या अंगमेहनतीने जी खारबंदिस्ती उभारायचे ती अतिशय भक्कम असायची मात्र आता अत्याधुनिक यंत्रांच्या द्वारे विविध प्रकारची मशीनरी वापरून देखील ही बंदिस्ती निकृष्ट दर्जाची होऊन ती वाहून जात असल्याने यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होत असेल हे स्पष्ट होत आहे. तालुक्यातील कणे – कोप्रोली ही जवळपास नऊ ते दहा कोटी खर्च करून तयार होत असलेल्या बंदिस्तीच्या कामाचे शुभारंभ 26 जानेवारी रोजी करण्यात आला. मात्र नियमानुसार ज्या पद्धतीचे काम सुरुवातीला करायला हवे होते त्याप्रमाणे कामाची सुरुवात न झाल्याने ही बंदिस्ती आता हळूहळू पावसाच्या तसेच उधाणाच्या पाण्याने फुटत चालली आहे. मात्र ठेकेदाराने जावई शोध लावत हे पाणी थांबविण्यासाठी बांबू उभे केले आहेत.

जवळपास 32 वर्षानंतर ही बंदिस्ती होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत कामासाठी आपल्या शेतामधून ठेकेदाराच्या मशिनरी आणि मालाच्या गाड्या जाण्यासाठी रस्ता दिला. त्याबदल्यात शेतकऱ्यांना शेतीची होणारी नुकसानभरपाई आणि कडक झालेली शेती नांगरून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तर नाहीच पण ही खारबंदिस्ती सुद्धा निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप गाव समिती अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे आणि ग्रामस्थ श्रीकांत पाटील यांनी केला आहे. एकंदरीतच पेण खारेपाट भागातील जनतेला फक्त पिण्याच्या पाण्यापासूनच नाही तर आपली शेती वाचविण्यासाठी आणि गावात येणाऱ्या पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी देखील समस्येला तोंड द्यावे लागत आहे याशिवाय मोठे संकट काय असू शकते.

सदर कामाचा मुख्य ठेकेदार हा काम सुरू झाल्यापासून इकडे फिरकलाच नसून दुसऱ्या व्यक्तीवर काम सोपवून हात वर केलेले आहेत, तर अधिकारी वर्गाकडून देखील सदर ठेकेदाराचे कशाप्रकारे काम चालू आहे याचा पाठपुरावा घेतला जात नाही शिवाय आम्ही या कामाबाबत शासकीय कार्यालयात आंदोलने केली, पत्रव्यवहार केले तरी देखील या ठेकेदाराबाबत तशा प्रकारचा पत्रव्यवहार संबंधित अधिकारी वरिष्ठ स्तरावर करत नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

32 वर्षानंतर हे काम होत आहे हे ऐकून समाधान वाटत होते. मात्र हे अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम होईल असे वाटले नव्हते. प्रशासनाला या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत पत्रव्यवहार केला, आंदोलने केली तरी देखील या ठेकेदारावर कारवाई झाली नाही.त्यामुळे या सर्व प्रकाराला ठेकेदारासह अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत – गाव समिती अध्यक्ष कणे,राजेंद्र म्हात्रे यांनी सांगितलं आहे.

सदर खारबंदिस्तीचा शेतकऱ्यांच्या शेतीचे बचाव होण्यासाठी काहीही उपयोग नाही. ठेकेदाराने आम्हाला आमच्या शेतातील नुकसानीचे भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते त्यातही आमची दिशाभूल केली आहे. या निकृष्ट दर्जाचे कामामुळे आमची नऊशे एकर जमीन पाण्याखाली जाऊन नुकसान होणार आहे आणि या सर्व प्रकाराला ठेकेदारासह संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. कणे, ग्रामस्थ श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Web Title: Raigad news 900 acres of farmland at risk of being submerged fear of salt embankment being washed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • pen news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
1

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.