Matheran News : माथेरान डोंगराच्या अगदी समोर असलेल्या ढाक चा डोंगर खऱ्या अर्थाने वनराईने नटलेला प्रदेशाला पूर्वी मिनी माथेरान समजले जात होते. 20 वर्षात मिनी माथेरान तयार होणार असे सांगितले…
Matheran News :हस्तकला वस्तूंना माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटक यांच्याकडून प्रचंड मागणी आहे. कपाडिया मार्केट समोर किमान 100 वर्षे व्यवसाय करणारे हे आदिवासी सुशोभीकरणाच्या नावाखाली बेदखल होण्याची भीती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत टाटा कंपनी कडून धरण बांधले जात आहे.या धरणाचे कामासाठी गेली वर्षभर दररोज सुरुंग स्फोट केले जात असून त्या स्फोटामुळे येथील आदिवासी लोकांच्या घरांना तडे गेले आहेत.
कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाडी परिसरात माती उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर मातीचे ढिगारे साचले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ पाहता अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. हीच समस्या लक्षात घेत आता यावर उपाययोजना राबवण्यात आलेली आहे.
कर्जत कल्याण राज्य मार्ग 76 ते जुम्मापट्टी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. हा रस्ता तीन ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवली पासून सुरुवात झालेली आहे.
तालुक्यातील पळसदरी रोड परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी तापासात शॉर्टसर्किट म्हणण्यात आलेलं आहे.
तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे.जलजीवन योजनेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नळपाणी योजना यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची टंचाई वाढली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील चार दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोखे आंदोलन केले.
टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाविरोधात 5 जून रोजी मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जनजागृती म्हणून 20 मे पासून दरम्यान कर्जत तालुक्यात धरणे आंदोलन…
जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे 21 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील आरोपीला अखेर पाच दिवसांच्या शोधमोहीमेनंतर रायगड पोलिसांनी अटक केली
अलिबाग तालुक्यासाठी पंचायत समितीला उपलब्ध झालेला 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा योग्य विनियोग केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक पंचायत समिती सदस्याला कामे सुचवण्यास सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणी टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. यातील 3000 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असून तेथील ग्रामपंचायत कडून प्रकल्प रद्द करावा अशी भूमिका…
तालुक्यात पाली खालाटी मध्ये होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.त्या ठिकाणच्या आदिवासी लोकांना त्रास आणि त्यांच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश रोखला जावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे.
तालुक्यात संपलेला पक्ष म्हणून बोलणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जोरावर जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि कर्जत नगरपरिषदमध्ये आपला पक्ष सत्तेवर आहे, असा दावा करण्यात आला आहे,