Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप उमेदवार महेश बालदी यांच्या ‘त्या’ वक्तव्याने आगरी समाजात नाराजी ! समाजाची माफी मागण्याची आगरी परिषदेची मागणी

भाजपचे उरण मतदारसंघातील उमेदवार महेश बालदी यांनी केलेल्या एका वक्तव्याने आगरी समाज नाराज झाला असून आगरी समाजाची माफी मागावी अशी मागणी अखिल भारतीय आगरी परिषदेने केली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 01, 2024 | 06:42 PM
फोटो सौजन्य - Mahesh Baldi इंस्टाग्राम

फोटो सौजन्य - Mahesh Baldi इंस्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:

दिपक घऱत/ रायगड:  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काळ सुरु झाला आहे. प्रत्येक उमेदवार मतदारसंघ बांधणीचे काम करत आहे. रायगडमधील उरण मतदारसंघातही महेश बालदी यांनी मतदारसंघात प्रचार सुरु केला असून या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगरी समाजाच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागत आहे. तसेच त्यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी ही मागणी ही केली जात आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत, त्या निवडणुकीमध्ये अखिल आगरी समाज परिषद राजकारणापासून अलिप्त आहे असे असताना उरण विधानसभेतील उमेदवार महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत मी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेच्या निवडणूकीला उभा नसून, विधानसभेच्या निवडणूकीला उभा आहे, असे वक्तव्य करून आगरी समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचे वक्तव्य निषेधार्थ असून आगरी समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी. असे अखिल आगरी समाज परिषदेने त्यांना सुचविले आहे.

हे देखील वाचा-Daund Assembly Election: ‘जे होईल ते होईल…’; दौंडमध्ये अजित पवार गटाकडून बंडखोरीचे निशाण

अखिल आगरी समाज परिषद ही राजकारण विरहित सामाजिक काम गेले अनेक वर्ष करीत आहे. या परिषदेसाठी कॉ. जि.एल.पाटील, ग. ल. पाटील, वाजेकर शेठ, सोनूभाऊ बसवंत, अ‍ॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, व दि.बा.पाटील यांनी फार मोठे योगदान दिले आहे. दि.बा. पाटील यांनी १९८८ ते २०१३ पर्यंत या परिषदेचे समर्थ नेतृत्व केले आहे. त्यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी अखिल आगरी समाज परिषदेच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पूणे आदि जिल्हयातील प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांची सर्व पक्षीय लढा दिला. त्यामुळे या लढयाची दखल घेवून, राज्यसरकारने या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुर केला व तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. लवकरच या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव जाहीर करण्यात येईल. असे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री नायडू यांनी सर्व पक्षीय कृती समितीला दिले आहे.

हे देखील वाचा- महागाईने त्रस्त जनता भाजपला घरचा रस्ता दाखवेल…: पुण्यातील कॉंग्रेस नेत्यांनी घेतली आक्रमक भूमिका

दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करण्यात येणार  असे असताना महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत अदानी विमानतळाशी चर्चा केली असल्याचे सांगितले. हे ही त्यांचे वक्तव्य चुकीचे व दि.बा.पाटील यांच्या नावाला विरोध करणारे असल्याचा समज आगरी समाजात पसरली आहे. बालदी यांच्या या वक्तव्यामुळे भूमीपुत्रांच्या अस्मितेला धक्का पोहोचला आहे.या दोन्ही वक्तव्यासंबंधी महेश बालदी यांनी जाहीर माफी मागावी असे अखिल आगरी समाज परिषदेने त्यांना सुचविले आहे.

 

Web Title: Bjp candidate mahesh baldis statement made angered the agri community agari parishad demands an apology from candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 06:42 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
2

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
3

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी
4

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.