Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रेवस-करंजा रो-रो सेवा पुन्हा चर्चेत! प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग

रो-रो प्रकल्पासाठी आधीच कोट्यवधींचा खर्च केला गेला आहे. अशातच आता पुन्हा रो-रो सेवा सुरू करण्याची चर्चा सुरु झाली आहे. पण ही सेवा खरंच गरजेची आहे का, असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2025 | 02:56 PM
Raigad News: रेवस-करंजा रो-रो सेवा पुन्हा चर्चेत! प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग

Raigad News: रेवस-करंजा रो-रो सेवा पुन्हा चर्चेत! प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग

Follow Us
Close
Follow Us:
  • करंजा-रेवस पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू
  • पुन्हा रो-रो सेवा सुरू करणे गरजेचे आहे का? नागरिकांचा प्रश्न
  • विविध कारणांमपुळे प्रकल्प अनेकदा ठप्प
उरण तालुक्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी रेवस-करंजा रो-रो सेवा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प आता पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला असून या निर्णयाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कारण, या मार्गावर करंजा-रेवस पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले असताना, त्याच मार्गावर पुन्हा रो-रो सेवा सुरू करणे कितपत गरजेचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी

रेवस करंजादरम्यान धरमतर खाडी ओलांडून वाहने आणि प्रवासी दोघांना ने-आण करण्यासाठीची ही जलवाहतूक सेवा, मुख्य उद्देश मुंबई-अलिबाग प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणे हा आहे, मात्र जेट्टींच्या बांधकामातील तांत्रिक अडचणी, कंत्राटदार बदल, निधी वितरणातील विलंब अशा कारणांमुळे हा प्रकल्प अनेकदा ठप्प झाला आहे, तर याच मार्गावर राज्य शासनाने करंजा-रेवस पूल उभारण्याच्या प्रकल्पाला गती दिली आहे.

निधीचा चुराडा की खऱ्या अर्थाने सुविधा?

रो-रो प्रकल्पासाठी आधीच कोट्यवधींचा खर्च केला गेला आहे. आता पुन्हा जेट्टीचे उर्वरित काम, नौकांचे तांत्रिक परीक्षण, संचालनासाठी अतिरिक्त निधी याकरिता मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. म्हणूनच पूल तयार होत असताना रो-रोची गरज कोणाला? आणि निधीचा चुराडा का केला जातोय? असे प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत. पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले तर रो-रो सेवेचा उपयोग मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पण पुलाचे काम विलंबित झाले तर रो-रो सेवा तात्पुरता पर्याय ठरू शकते, रेवस-करंजा पुलाचे काम सुरू असताना रो-रो प्रकल्प पुन्हा चालू करण्यामागील हेतू स्पष्ट करणे, हे शासन व प्रशासनाची जबाबदारी ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कोट्यवधींचा खर्च कशाला?

पूल तयार झाल्यावर चारचाकी आणि अवजड वाहने सहजतेने जाऊ शकतील. यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे पारंपरिक सेवा आणि रो-रो सेवा यांच्या माध्यमातून खाडी ओलांडण्याचा प्रश्नच उरणार नाही. मग अशा स्थितीत रो-रोसाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. सध्या खाडीतून पारंपरिक तर सेवा सुरू आहे. यातून प्रवासी वाहतूक नियमित होते, मात्र वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने मर्यादा जाणवतात, याच कारणामुळे रो-रो सेवेला मागणी असली, तरी पुलाच्या बांधकामामुळे तिचे महत्त्व कमी होणार आहे, असेही काही नागरिकांचे मत आहे.

Mumbai Cyber Fraud: मुंबई बनले आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे केंद्र! एका वर्षात इतक्या कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, अब्जावधींची लूट

उरणमधील स्थानिक नागरिक अजित थळी यांनी सांगितलं आहे की, मी आजाराने ग्रासलेला असल्याने मला प्रवास करायचा असेल तर सुखकर प्रवासाचा मार्ग निवडेन, म्हणजेच जर पूल आणि रो-रोबाबत विचाराल तर मी पुलावरून जाणे पसंत करेन, रो-रो मार्ग बदलता प्रवास करणे नक्कीच कंटाळवाणा आणि खर्चिक ठरेल. त्यामुळे या सेवेच्या वापरापेक्षा पुलाचा वापर अधिक होईल, तर पूल सुरू झाल्यास रो-रो सेवा बंद पडेल. यामुळे या सेवेवर झालेला अनाठाई खर्च फुकट जाईल.

Web Title: Revas karanja ro ro ferry service back in focus efforts intensify to restart the project raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • raigad
  • Raigad News
  • Uran

संबंधित बातम्या

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी
1

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे
2

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन
3

Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग
4

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.