
jawhar protest
जव्हार: गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर (Manipur Violence) येथे जातीय हिंसा सुरू आहे, या आंदोलनात आदिवासी समाजातील महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती.या क्रूर घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. हा अमानवी प्रकार सहन होत नसल्याने जव्हार तालुक्यातील आदिवासी समाजातर्फे बुधवारी सकाळी 11 वाजता जव्हार शहरातील बिरसा मुंडा क्रांतिकारी चौक येथे हजारो संख्येने एकत्र येवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Jawhar Protest News)
आदिवासी समाजाची मागणी काय ?
जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना, सर्व पक्ष एकत्र येऊन सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको करीत चक्काजाम करण्यात आला. मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पोहचावे यासाठी जव्हार तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (Palghar News)
[read_also content=”वक्फ बोर्ड वाद : स्मृती इराणी म्हणाल्या, तुम्हाला धर्मातून वगळण्याचा अधिकार.. https://www.navarashtra.com/india/waqf-board-controversy-smriti-irani-said-right-to-exclude-you-from-religion-nrab-437219.html”]
यावेळी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते भावना पवार, एकनाथ दरोडा, बळवंत गावित तसेच आदिवासी समाजातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर व्यक्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे महिलांच्या न्यायासाठी महिलांची उपस्थिती अधिक होती. पोलिसांनी देखील सुरक्षेची जबाबदारी योग्य प्रकारे हाताळली.