Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS100Years : ज्यांना हिंदू शब्दांवर आक्षेप आहे त्यांनी…; RSS च्या शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत स्पष्टच मांडले विचार

RSS100Years : विजयादशमीच्या निमित्ताने नागपूरमधील संघ कार्यालय असलेल्या रेशमीबागेत सोहळा पार पडला. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू बांधवांना आवाहन केले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 02, 2025 | 11:42 AM
RSS Completes 100 Years: Mohan Bhagwat’s Speech at Reshimbagh, Nagpur

RSS Completes 100 Years: Mohan Bhagwat’s Speech at Reshimbagh, Nagpur

Follow Us
Close
Follow Us:

RSS100Years :  नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज त्यांची 100 वी जयंती साजरी करत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संघ स्वयंसेवक आणि भाजप पक्षाकडून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागपुरा तील रेशमबाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. संघशताब्दी निमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, ट्ररिफ वॉर आणि शेजारील देशांवरील परिस्थिती त्याचबरोबर देशातील हिंदू बांधव अशा सर्वच मुद्द्यांवर मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे.

संघशताब्दीनिमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबागमधून संपूर्ण विश्वातील स्वयंसेवकांना संबोधित केले. यावेळी मोहन भागवत यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. भागवत म्हणाले की “काही महिन्यांपूर्वी पहलगामसारखी दुर्घटना झाली. धर्म विचारून निष्पाप लोकांची हत्या झाली. या घटनेनंतर सेना आणि सरकारने ठामपणे उत्तर दिले. ज्यामुळे नेतृत्वाची दृढता दिसून आली. आपण सर्वांशी मैत्री ठेवावी, पण आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला समर्थ आणि सजग राहणे आवश्यक आहे”, असे मोहन भागवत म्हणाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदू संस्कृती आणि हिंदू बांधवांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. आपली संस्कृती सगळ्यांचा सन्मान व स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचं जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्‌या हिंदू समाजाने केलं आहे, त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीही म्हटलं जातं. भारतात या संस्कृतीला आवश्यक समृद्ध व सुरक्षित वातावरण मिळाले. पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी आपल्या पूर्वजानी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे. त्या संस्कृतीचे आचरण, आपल्‌या पूर्वजांचा गौरव, विवेकपूर्ण आचरण व आपल्या मातृ‌भूमीची भक्ती हे सगळे मिळू आपले राष्ट्रीयत्व तयार होतं, अशा भावना आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शताब्दीवर्षानिमित्त व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सरसंघचालक पुढे म्हणाले, “सर्व विविधतेला एकत्र ठेवणारी आपली संस्कृती हीच आपली राष्ट्रीयता आहे. हीच आपली हिंदू राष्ट्रीयता आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप आहे, त्यांनी हिंदवी म्हणावं, भारतीय म्हणावं. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पण या राष्ट्रीयतेचं स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे हिंदू आपले राष्ट्र राज्यावर आधारित नव्हतंच कधी. आपलं आपल्या पवित्र मातृभूमीवरील प्रेम, भक्ती एकत्रितपणे आपले राष्ट्रप्रेम निर्माण करते. आदराने सर्वांना एकत्र आणणारे हे हिंदू राष्ट्रप्रेम आपल्याला नेहमीच एकसंध ठेवत आले आहे. आपल्याकडे ‘राष्ट्रराज्य (नेशन-स्टेट) ही संकल्पना नाही. राज्ये येतात आणि जातात, पण राष्ट्र कायम टिकते. आपण आपल्या एकतेचा हा पाया कधीही विसरता कामा नये, असे देखील मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Rss completes 100 years mohan bhagwats speech at reshimbagh nagpur live news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Nagpur RSS
  • RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा
1

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात
2

Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास
3

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले
4

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.