Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… त्यामुळे जनतेला बदल करून महायुतीचे सरकार बाजूला करायचे आहे”; शरद पवारांचे महत्व विधान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खऱ्या अर्थाने चांगले काम करून दिल्लीचे नाव उज्वल ठेवण्याचे काम केले आहे, सध्याच्या मुख्यमंत्री देखील कर्तुत्वान महिला आहेत, त्यादेखील चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वास वाटतो, असे शरद पवार यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2024 | 09:43 PM
"... त्यामुळे जनतेला बदल करून महायुतीचे सरकार बाजूला करायचे आहे''; शरद पवारांचे महत्व विधान

"... त्यामुळे जनतेला बदल करून महायुतीचे सरकार बाजूला करायचे आहे''; शरद पवारांचे महत्व विधान

Follow Us
Close
Follow Us:

बारामती: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार , काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे या पक्षाची एकत्रित बैठक घेऊन जागावाटप झाल्यानंतर उमेदवारी देण्याचा निर्णय होईल. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात ३० जागा मिळाल्या, त्यामुळे जनतेला महाराष्ट्रात बदल करून माहितीचे सरकार बाजूला करायचे आहे, हे यावरून स्पष्ट होत असून राष्ट्रवादी काँग्रेस मधील जागावाटपा बाबत पक्षातील वरिष्ठ नेते एकत्रित बसून निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असून ते भेट घेत असल्याच्या प्रश्नाबाबत बोलताना पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नेहमी इच्छुक उमेदवारांसह त्यांचे समर्थक आपणास भेटत असतात. उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील संबंधित विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते हा अभ्यास करत आहेत. दरम्यान विधानसभेची निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढवणार आहोत. त्यामुळे या तिन्ही पक्षातील नेत्यांची एकत्रित बैठक होऊन जागावाटप फायनल होईल, यानंतर उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू होईल. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता. तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे तब्बल ३० उमेदवार निवडून आले. राज्यातील जनतेला बदल हवा आहे, हे यावरून स्पष्ट होते. राज्यातील माहितीचे सरकार बाजूला करण्याच्या मनस्थितीमध्ये राज्यातील जनता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अनुकूल स्थिती असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खऱ्या अर्थाने चांगले काम करून दिल्लीचे नाव उज्वल ठेवण्याचे काम केले आहे, सध्याच्या मुख्यमंत्री देखील कर्तुत्वान महिला आहेत, त्यादेखील चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वास वाटतो, असे शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
वन नेशन, वन इलेक्शन या निर्णयाबाबत बोलताना आम्ही इंडिया आघाडीचे नेते या विषयावर एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. धनगर व मराठा आरक्षणाबाबत सामंजस्याची भूमिका सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सामाजिक वातावरण व्यवस्थित राहण्याची खबरदारी या विषयांमध्ये सरकारने घेण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

Web Title: Sharad pawar said in that maha vikas aghadi government will come in the maharashtra assembly elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 09:29 PM

Topics:  

  • baramati
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
2

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त
3

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर
4

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.