Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या गाड्या तात्काळ येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे, श्रीरंग बरगे यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे विनंती

एसटीने १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली असली तरी गेल्या दहा दिवसांचे सरासरी उत्पन्न पाहिल्यास त्यातून फक्त साधारण ७.५ टक्के इतकेच उत्पन्न मिळाले आहे.एसटीच्या ताफ्यात प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत गाड्या कमी पडत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 14, 2025 | 04:55 AM
CM Devendra Fadnavis' reaction to Yogesh Kadam's statement on Pune crime case

CM Devendra Fadnavis' reaction to Yogesh Kadam's statement on Pune crime case

Follow Us
Close
Follow Us:

St Mahamandal : एसटीच्या ताफ्यात प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत गाड्या कमी पडत असल्याने भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात प्रशासन हतबल ठरले असून नव्या गाड्या तात्काळ येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असून त्यात भाडेवाढीसह नवीन गाड्या ताफ्यात दाखल होण्यासाठी होणाऱ्या विलंबा बाबतीत सविस्तर माहिती विषद करण्यात आली आहे.

एसटीने १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली असली तरी गेल्या दहा दिवसांचे सरासरी उत्पन्न पाहिल्यास त्यातून फक्त साधारण ७.५ टक्के इतकेच उत्पन्न मिळाले आहे.भाडेवाढी पूर्वीचे उत्पन्न दिवसाला सरासरी २८ कोटी रुपये असून भाडेवाढीनंतर दिवसाला सरासरी ३२ कोटी ७४ लाख रुपये इतके उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना फक्त ३० कोटी २२ लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळत असून साधारण २ कोटी ५१ लाख रुपये इतकी रक्कम दिवसाला अपेक्षित उत्पन्नपेक्षा कमी मिळत आहे. याचाच अर्थ भाडेवाढ करूनही गाड्या कमी पडत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही.त्या मुळे नवीन गाड्या ताफ्यात तात्काळ येण्याची गरज असून फेब्रुवारी २४ पासून नव्याने येणाऱ्या ५१५० भाडे तत्वावरील इलेक्ट्रिक बस पैकी आता पर्यंत फक्त २२० बस आल्या असून कबूल करून सुद्धा महिन्याला २०० पेक्षा जास्त गाड्या दिलेल्या नाहीत.फेब्रुवारी पासून आता पर्यंत पुरवठादार कंपनीने साधारण २५०० गाड्या कमी दिल्या आहेत.

“तिकडे लागली वाळवी म्हणूनच…”; राजन साळवींचा पक्षप्रवेश अन् एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

या शिवाय सद्या सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बस मधून प्रती किलो मिटर १५ ते २०रुपये इतके नुकसान होत आहे त्या मुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला पाहिजे.व झालेली नुकसान भरपाई तसेच दंड कंपनीकडून वसूल करण्यात आला पाहिजे. गाड्या लवकर येण्यात एसटी प्रशासन हतबल झालेले दिसत असून ते पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्यात कुचराई करीत आहे.त्या मुळे यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष दिले व हस्तक्षेप केला तरच गाड्या लवकर येतील.असेही निवेदनात बरगे यांनी म्हटले आहे.

या शिवाय नोव्हेंबर नंतर येणाऱ्या नवीन स्व मालकीच्या २६४० गाड्यांपैकी आता पर्यंत फक्त ११० गाड्या पुरवठादार कंपनीने दिल्या असून तिथेही साधारण अपेक्षित ३०० गाड्या वेळेवर आलेल्या नाहीत. या दोन्ही प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून गाड्या ताफ्यात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच उपयोग होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.त्याच प्रमाणे भाडेवाढ करतांना एकच्या पटीत करण्यात आल्याने प्रवाशी व वाहक यांच्यात सुट्या पैशावरून दररोज तंटे निर्माण होत असून त्याचाही फटका उत्पन्न वाढीला बसत असून भाडेवाढ सूत्रात तात्काळ बदल करण्यात येऊन भाडेवाढ पाचच्या पटीत केली पाहिजे असेही बरगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

मध्य रेल्वे कडून पैशाची उधळपट्टी, सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्यास सुरुवात; रेल्वे मंत्री चौकशी करतील काय?

Web Title: Shrirang barge in a memorandum to the cm requested the chief minister to personally look into the arrival of new trains immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 04:55 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Shrirang Barge

संबंधित बातम्या

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
1

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
2

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
3

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी
4

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.