Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad: पहेलगाम अतिरेकी हल्ल्याप्रकरणी ठाकरे गट आक्रमक

नेरळमध्ये शिवसेना ठाकरे गटाने पहेलगाम अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. शहरप्रमुख बंडू क्षीरसागर यांनी कठोर कारवाईची मागणी करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर पाठवण्याची मागणी केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2025 | 07:49 PM
Raigad: पहेलगाम अतिरेकी  हल्ल्याप्रकरणी ठाकरे गट आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर नेरळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

तर मग हजसाठी…Pahalgam Attack नंतर बाळासाहेबांच्या ‘या’ धाडसी भूमिकेची होतेय चर्चा

नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती आणि शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सुजाता मनवे यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. “हल्लेखोर पाकिस्तानात किंवा पाताळात लपले असले, तरी त्यांना शोधून काढून कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेरळ शहरप्रमुख बंडू क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत केंद्र सरकारने आता अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. “देशाच्या सीमेवर सतत घडणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांनी देशातील निष्पाप नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे थांबवायचे असल्यास केंद्र सरकारने केवळ निवेदनं न देता, तातडीने कडक कारवाई केली पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या बिळातून ओढून काढावं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार मारावं. ही वेळ केवळ निषेध करण्याची नाही, तर थेट कारवाई करून अशा प्रवृत्तींचा कायमचा नायनाट करण्याची आहे. याशिवाय, पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर पाठवून तिथे अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात यावेत, जेणेकरून पुन्हा अशी हिंसक घटना घडणार नाही.” त्यांच्या या आक्रमक भाषणाला नागरिकांनी आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यांच्या मतानुसार, देशाच्या एकात्मतेसाठी आता निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे.

Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर अवघ्या ८ तासात? समृद्धी महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण, एक्सप्रेस वे ‘या’ दिवशी सुरू होणार

या निषेध आंदोलनात उप तालुका संघटक सुधाकर देसाई, उप तालुका प्रमुख सुरेश गोमारे, माजी उप तालुका प्रमुख शशिकांत मोहिते, विभागप्रमुख अल्पेश मनवे, नेरळ शहराचे उपप्रमुख चींधू बाबरे, संतोष सारंग, युवासेना पदाधिकारी राहुल भाटकर, रमेश पवार, माजी शहर प्रमुख भाऊ क्षीरसागर, ग्रामपंचायत माजी सदस्य सुरेश भवारे, जेष्ठ शिवसैनिक सतीश ठाकरे, संजय कांबळे तसेच महिला आघाडीच्या कल्पना चव्हाण, प्राची मनवे, रश्मीला शेलार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले असून, अशा प्रकारच्या घटनांनी देशातील शांतता व एकात्मतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अतिरेकी करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कठोर पावले उचलून देशाच्या सुरक्षेसाठी ठोस कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Thackeray group aggressive in pahelgam terrorist attack case in neral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • neral
  • terror attack

संबंधित बातम्या

India High Alert: भारताला दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट? ‘या’ महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश
1

India High Alert: भारताला दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट? ‘या’ महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश

आता ‘या’ आफ्रिकन देशातही दहशतवादाचे सावट; लष्करी हल्लात ५० सैनिकांचा मृत्यू
2

आता ‘या’ आफ्रिकन देशातही दहशतवादाचे सावट; लष्करी हल्लात ५० सैनिकांचा मृत्यू

काँगोमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केले रक्तरंजित हत्याकांड; महिलांसह 66 जणांची निर्घृण हत्या
3

काँगोमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केले रक्तरंजित हत्याकांड; महिलांसह 66 जणांची निर्घृण हत्या

पाकिस्तानचा अखेर झाला पर्दाफाश, दहशतवादी कारवायांसाठी भरावा लागणार डिजिटल दंड
4

पाकिस्तानचा अखेर झाला पर्दाफाश, दहशतवादी कारवायांसाठी भरावा लागणार डिजिटल दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.