City Of Lakes गोष्ट तलावांची: ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठाण्यातील मासुंदा तलाव
रस्त्यांवर वाढलेलं ट्राफिक, सिमेंटच्या टॉवरने वाढलेलं घनदाट जंगल या सगळ्यातही निर्सर्गाचा ठेवा जतन असलेलं ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव.
ठाण्यातील या मासुंदा तलावाला नैसर्गिक सौंदर्याप्रमाणे ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. ठाणे शहरातील तलावांच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालंच तर, इ.स. 1538 मध्ये शहरात एकूण 60 तलाव होते. यातील मासुंदा तलाव हे सर्वात प्रचीन तलाव असल्याचं सांगितलं जातं.
इ.स. 815 ते 1265 या काळात ठाणे शहरात 'शिलाहार' घराण्याची सत्ता होती. त्यावेळी ठाणे शहर 'शिलाहार' घराण्याची राजधानी म्हणून ओळखली जात होती.
'शिलाहार' घराण्यातील मुख्य राजा हा शिवभक्त होता. या राजाने तलावाच्या जवळ कोपिनेश्वराच्या मंदिराची स्थापना केली. या राजाच्या काळात तलावात दशक्रिया विधी करण्यात येत असत.
'मास' म्हणजे महिना आणि 'उंदा' म्हणजे पिंडदान. याचा अपभ्रंश करत, कालांतराने या तलावाची ओळख 'मासुंदा तलाव' म्हणून होत गेली.
या घराण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा मासुंदा तलाव म्हणजे आताची 'तलावपाळी' आहे. ठाणे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तलावाच्या जवळच नाट्यकलेचा वारसा जपणारं गडकरी रंगायत आहे.
पर्यटकांचा आकर्षित करण्यासाठी ठाणे महानगरपालिने या तलावावर बोटींग सुरु केली आहे.
तलावाच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा आणि महादेवाचं मंदिरामुळे तलावाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं.
स्वच्छ जागा, आजुबाजूला असलेली झाडं यामुळे पावसाळ्यात हे तलाव ठाणे आणि आजूबाजुच्या परिसरातील पर्यटकांना कायमच खुणावतं.
तलावाच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा आणि महादेवाचं मंदिरामुळे तलावाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं.