Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“योग्य ती उपाययोजना करा, अन्यथा…”, कल्याणमधील वाहतूक कोंडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

कल्याणमधील वालधुनी ते बाईचा पुतळा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरील खड्डे देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. याच वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 24, 2025 | 09:30 PM
"योग्य ती उपाययोजना करा, अन्यथा...", कल्याणमधील वाहतूक कोंडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

"योग्य ती उपाययोजना करा, अन्यथा...", कल्याणमधील वाहतूक कोंडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण पश्चिमेतील वालधुनी ते बाईचा पुतळा या परिसरातील वाहतूक स्थिती नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. या रस्त्यावरील सततची वाहतूक कोंडी शालेय विद्यार्थी, नोकरवर्ग, रुग्णवाहिका तसेच सामान्य नागरिकांसाठी मोठा त्रास ठरत आहे. नागरिकांना साधारण एक किलोमीटरचा प्रवास करण्यासाठीही दीड तासापेक्षा जास्त वेळ लागतो, ज्यामुळे रोजच्या जीवनात गंभीर अडचणी निर्माण होत आहेत.

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दर्शन देशमुख यांनी कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी किरण बालवडकर यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये या परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्या, रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, वाहतूक कोंडीवर त्वरित आणि योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, याची मागणी करण्यात आली.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली

दर्शन देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले की, जर लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढला गेला नाही, तर राष्ट्रवादी पक्षाने या परिसरात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, या परिसरातील वाहतूक कोंडीची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे.

या निवेदनावर प्रतिक्रिया देताना कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी किरण बालवडकर यांनी सांगितले की, सदर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे असून हे खड्डेही वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहेत. याशिवाय, नागरिकांनी दिलेल्या तक्रारी आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे निवेदन त्यांनी गांभीर्याने घेतले असून, त्वरित कारवाई करून वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एसीपी बालवडकर यांनी स्पष्ट केले की, रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याचे काम आणि वाहतूक नियमन करतांना तातडीने सुधारणा केली जातील, जेणेकरून नागरिकांना रोजच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी कमी होतील.

Pune Rain News: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा मुसळधार; पुढील 2 दिवस शहरात…

ही घटना या भागातील नागरिकांसाठी फक्त वाहतूक कोंडीची समस्या नाही, तर रोजच्या जीवनावर थेट परिणाम करणारी समस्या म्हणून महत्त्वाची ठरली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनामुळे प्रशासनास या समस्येची जाणीव झाली असून, भविष्यात या परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे अपेक्षित आहे.

 

Web Title: Thane news ncp aggressive against kalyan traffic problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • kalyan news
  • Thane news
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Water Pipeline Burst : लाखो लीटर पाणी वाया! ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि पालिकेडून नागरिकांची फसवणूक, ठाण्यात चाललंय तरी काय?
1

Water Pipeline Burst : लाखो लीटर पाणी वाया! ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि पालिकेडून नागरिकांची फसवणूक, ठाण्यात चाललंय तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.