सोलापूर : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती हे जरी असले तरी उत्तम शेती हाच मोठा पर्याय आहे, असे सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी सांगितले.
कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांबाळे, डाळींब संशोधन केंद्रांचे डाॅ. अमृतसागर, ‘आत्मा’चे सहसंचालक मदन मुकणे, जिल्हा कृषी अधिकारी कुंभार प्रमुख उपस्थित होते.
भविष्यातील शेती समोरील आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे सांगून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेती आहे तर भाकरी आहे. असे सांगून सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, शेतीचे उत्पादन वाढविण्याचे महत्वाचे काम माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले. त्यांचे शेती क्षेत्रातील योगदान कोणी विसरू शकणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरा करणेचा निर्णय घेतला. मी पुसद उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. स्वत: नाईक यांची शेती मी पाहिली आहे. मुख्यमंत्रिपदावर राहिलेली व्यक्ती पदावर असताना न नसताना देखील शेतीत रममाण व्हायची. त्यांना मातीची ओढ होती म्हणून त्यांनी कृषी क्षेत्रात मोठे काम केले.
शेतकऱ्यांची मुले कलेक्टर झाली पाहिजे
शेतकरी यांची मुले कलेक्टर झाली पाहिजे. कारखानदार झाली पाहिजे हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता परिस्थिती बदलत आहेत. शेतकरी यांचे मुले कारखानदार झाली. जिल्हाधिकारी झाली आहेत. वसंतराव नाईक यांचे स्वप्न साकार होत आहे. कृषी क्षेत्रातील अर्थ पुरवठा लक्षण होण्यासाठी त्यांनी दिलेले येगदान महत्वपूर्ण आहे.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे म्हणाले, कृषी क्षेत्राला बळकटी देणेच काम वसंतराव नाईक यांनी केले. त्यांचे शेती विषयक विचार व त्या दृष्टीने केलेली कृती महत्वपूर्ण आहे. दशरथ तांबाळे, डाळींब संशोधन केंद्रांचे डाॅ. अमृतसागर, मदन मुकणे यांनी मनोगत व्यक्त केले.