Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक घोट पाणी मिळणं देखील कठीण…कर्जतमधील ‘या’ गावात चक्क 15 दिवसापासून पाण्याचा थेंबही नाही

महाराष्ट्रातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामाना करावा लागत आहे. अशातच आता कर्जत तालुक्यातील एका गावात नागरिकांना चक्क एक घोट पाणी मिळणं देखील कठीण झालं आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 24, 2025 | 09:09 PM
एक घोट पाणी मिळणं देखील कठीण...कर्जतमधील 'या' गावात चक्क 15 दिवसापासून पाण्याचा थेंबही नाही

एक घोट पाणी मिळणं देखील कठीण...कर्जतमधील 'या' गावात चक्क 15 दिवसापासून पाण्याचा थेंबही नाही

Follow Us
Close
Follow Us:

संतोष पेरणे: पाणीटंचाई ही फक्त महाराष्ट्र नाही तर देशासमोर असणारी एक मोठी समस्या आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक भागात विशेषकरून ग्रामीण भागात पाण्याची समस्या दिसून येते. अशातच आता कर्जत तालुक्यातील एका गावात चक्क 15 दिवसापासून ग्रांमस्थाना पाण्याचा थेंबही मिळाला नाही आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मधील लाखाची वाडीमध्ये जलजीवन मिशन मधून नळपाणी योजना राबविण्यात आली. मात्र या नळपाणी योजनेच्या विहिरीतील पाणी तेथील फार्म हाऊस मालकाने पळवले असल्याने त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना गेली 15 दिवस पिण्याचे पाणी मिळाले नाही.त्यामुळे नळपाणी योजना असून देखील पाण्याची टंचाई जाणवत असल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Pahalgam Terror Attack: “पाकिस्तानचा अब्बासुद्धा…”; पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणे कडाडले

नांदगाव ग्रामपंचायत मधील लाखाची वाडी येथील ग्रामस्थांना गेल्या 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जाव लागत आहे. जल जीवन मिशन मधून नळपाणी योजना राबविण्यात आलेली असून देखील नळाचे पाणी मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात आदिवासी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या नळपाणी योजनेचे विहिरीत पाणी असून देखील घरकुल योजनेअंतर्गत लावलेल्या मोटारीमुळे सगळं पाणी खेचून घेतले जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही.त्याचवेळी तेथील फार्म हाऊस मालक यांनी विहिरी मध्ये पाईप टाकून पाणी उचलण्याचे उदव्याप सुरू केले असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.

Naresh Maske statement : रेल्वेने गेलेल्या पर्यटकांना विमानानं आणलं..; शिंदेंचे खासदार बरळले, राजकीय वर्तुळात चर्चा

आदिवासी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आपल्या भावना व्यक्त करताना आम्हाला दिवसाला एक घोट पाणी मिळणं कठीण झाले आहे. विहिरीमध्ये पाणी असूनही ते फार्मवर नेले जात आहे. ग्रामस्थांना नळाची जोडणी दिली आहे,पण त्यामधून पाणी येत नाही.नळपाणी योजनेची टाकी सहा महिन्यांपूर्वी बांधली,पण पाणी पळविले जात असल्याने पाण्याची टाकी रिकामीच आहे. पाण्याचे वितरण करण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांना पाण्यासाठी लांब चालत जावे लागत आहे. दरम्यान आमच्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला देण्याची व्यवस्था करावी आणि आमचे पाण्याचं हाल थांबवा. विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरता यावं, आणि नळातून नियमित पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे.

Web Title: The citizens of nandgaon village have been facing water shortage for the last 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • maharashtra news
  • water issues

संबंधित बातम्या

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
1

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ
2

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा
3

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince
4

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.