एक घोट पाणी मिळणं देखील कठीण...कर्जतमधील 'या' गावात चक्क 15 दिवसापासून पाण्याचा थेंबही नाही
संतोष पेरणे: पाणीटंचाई ही फक्त महाराष्ट्र नाही तर देशासमोर असणारी एक मोठी समस्या आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक भागात विशेषकरून ग्रामीण भागात पाण्याची समस्या दिसून येते. अशातच आता कर्जत तालुक्यातील एका गावात चक्क 15 दिवसापासून ग्रांमस्थाना पाण्याचा थेंबही मिळाला नाही आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मधील लाखाची वाडीमध्ये जलजीवन मिशन मधून नळपाणी योजना राबविण्यात आली. मात्र या नळपाणी योजनेच्या विहिरीतील पाणी तेथील फार्म हाऊस मालकाने पळवले असल्याने त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना गेली 15 दिवस पिण्याचे पाणी मिळाले नाही.त्यामुळे नळपाणी योजना असून देखील पाण्याची टंचाई जाणवत असल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
Pahalgam Terror Attack: “पाकिस्तानचा अब्बासुद्धा…”; पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणे कडाडले
नांदगाव ग्रामपंचायत मधील लाखाची वाडी येथील ग्रामस्थांना गेल्या 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जाव लागत आहे. जल जीवन मिशन मधून नळपाणी योजना राबविण्यात आलेली असून देखील नळाचे पाणी मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात आदिवासी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या नळपाणी योजनेचे विहिरीत पाणी असून देखील घरकुल योजनेअंतर्गत लावलेल्या मोटारीमुळे सगळं पाणी खेचून घेतले जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही.त्याचवेळी तेथील फार्म हाऊस मालक यांनी विहिरी मध्ये पाईप टाकून पाणी उचलण्याचे उदव्याप सुरू केले असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.
आदिवासी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आपल्या भावना व्यक्त करताना आम्हाला दिवसाला एक घोट पाणी मिळणं कठीण झाले आहे. विहिरीमध्ये पाणी असूनही ते फार्मवर नेले जात आहे. ग्रामस्थांना नळाची जोडणी दिली आहे,पण त्यामधून पाणी येत नाही.नळपाणी योजनेची टाकी सहा महिन्यांपूर्वी बांधली,पण पाणी पळविले जात असल्याने पाण्याची टाकी रिकामीच आहे. पाण्याचे वितरण करण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांना पाण्यासाठी लांब चालत जावे लागत आहे. दरम्यान आमच्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला देण्याची व्यवस्था करावी आणि आमचे पाण्याचं हाल थांबवा. विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरता यावं, आणि नळातून नियमित पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे.