Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील काही भागांत पावसाचा जोर मंदावला; पुरंदर तालुक्यात पिकांचे पंचनामे सुरू

खरीप हंगाम तोंडावर असताना आणि उन्हाळी शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न अपेक्षित असताना मागील आठवडाभर पावसाने चारा पिके आडवी झाली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 01, 2025 | 01:01 PM
पावसाचा जोर मंदावला,;आता नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग.

पावसाचा जोर मंदावला,;आता नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग.

Follow Us
Follow Us:

नीरा : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस काहीसा कमी झाला. पुरंदर तालुक्यातील अति पावसाच्या भागासह दुष्काळी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. जनजीवन ठप्प झाले होते. नंतर, सायंकाळपासून सासवड, जेजुरी, वाल्हे, परिंचे, नीरा या भागात उघडीप दिली आहे. या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे झालेल्या नुकसानीची पंचनामे आता महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगात सुरू केले आहेत.

पुरंदर तालुक्यातील शेतकरी व गोपालक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा पिके करतात. परंतु अवकाळी पावसाची यंदा मोठी झळ या चारा उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. आठवड्याभरात कोसळलेल्या धुवांधार पावसाने हाताशी आलेले चार पिक शेतकऱ्यांना गमवावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मका, व्हंडी, कडवळ, घास हे पिक नष्ट झाल्यामुळे त्यांच्या जनावरांच्या पुढील चार महिन्यांसाठी चाऱ्याची सोय नव्याने करावी लागणार आहे.

दरम्यान, खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना आणि उन्हाळी शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न अपेक्षित असताना मागील आठवडाभर पावसाने चारा पिके आडवी झाली आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये पुरंदर तालुक्यात २७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सकाळी झाले सूर्यदर्शन 

आठवड्याभरानंतर बुधवारी सकाळी सूर्यदर्शन झाले होते. संध्याकाळी थोडावेळ पावसाच्या सरी कोसळल्यानंतर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसात पुरंदर किल्ला परिसरातील या अतिपावसाच्या गावांसह दुष्काळी राख, नावळी, कर्नलवाडी, वाल्हे, वाघदरवाडी, पिंगोरी तसेच दक्षिण पूर्व भागातील गावांना चांगलेच झोडपून काढले. त्यामध्ये रस्ते, नाले, ओढे, नद्या तुडुंब भरून वाहू लागले होते. तसेच शेतात पाण्याचे तळे निर्माण झाले होते.

अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान

पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाने कांदा, टोमॅटो, काकडी, भुईमूग, ज्वारी, बाजरी तरकारी पिकांचे नुकसान झाले. भुईमुगाच्या शेंगांना मोड आले. तरकारी पिके भुईसपाट झाली. तसेच जोरदार वाऱ्यामुळे आंब्याची फळे मोठ्या प्रमाणावर पडली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव म्हणाले, ‘‘सर्व कृषी पर्यवेक्षक व तलाठी यांना त्यांच्या मंडलातील पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करून झालेले नुकसान दाखवण्याचे सहकार्य करावे.’’

Web Title: The intensity of rains has decreased in some parts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • baramati news
  • Rain News

संबंधित बातम्या

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
1

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
2

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…
3

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.