मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकींच्या (BMC Electioin) पाशर्वभूमीवर आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (MNS) गटाध्यक्षांचा मेळावा मुंबईतील नेस्को मैदानावर पार पडला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच जिंकून दाखविण्याचा कानमंत्र दिला. जवळपास पाऊणतास राज ठाकरेंनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी राज्यपाल, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे, महापुरुषांची बदनामा करणाऱ्यांवर तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा होतील, पण कामाला लागा, विजय आपलाच आहे, मी तुम्हाला मुंबई महानगर पालिका हातात देतो, असा विश्वास राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.
[read_also content=”संजय राऊत यांनी शिंदे गटाचा धसका घेतलाय – भरत गोगावले https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-has-taken-a-blow-and-fear-from-the-shinde-group-bharat-gogavle-348921.html”]
…तर पुन्हा हनुमान चालिसा लावा
भोंगे उतरविण्याची बाळासाहेबांची इच्छा होती, ती पूर्ण आपण केली. भोंगे नाही काढले तरी हनुमान चालिसा लावू असं म्हटल्यावर सगळे भोंगे खाली उतरले. अजूनही संपूर्ण भोंगे उतरले नाहीत, जिथे-जिथे भोंगे सुरु असतील तिथे पहिल्यांदा पोलिसात तक्रार करा. पोलिसांनी जर तक्रार घेतली नाही तर, पोलिसांवर कारवाई होऊ शकते. त्यानंतर हनुमान चालिसा लावा. यावेळी जिथे भोंगे सुरु असतील तिथे पुन्हा हनुमान चालिसा लावण्याचा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला. मनसैनिकांकडून आरेला-कारे म्हटलंच पाहिजे. असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.